Special Report | नाशिकवर पुन्हा एकदा महापुराचं संकट?

Special Report | नाशिकवर पुन्हा एकदा महापुराचं संकट?

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 10:21 PM

वरुन पावसाची रिपरिप सुरुय तर आजूबाजूच्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरुय. या दोन गोष्टींमुळे नाशिकला पुन्हा एकदा पुराची भीती आहे. नाशिकचा गोदाघाट आणि रामकुंड परिसर जलमय झाला आहे.

वरुन पावसाची रिपरिप सुरुय तर आजूबाजूच्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरुय. या दोन गोष्टींमुळे नाशिकला पुन्हा एकदा पुराची भीती आहे. नाशिकचा गोदाघाट आणि रामकुंड परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे धरणांमधून पुन्हा विसर्ग वाढवावा लागला तर नाशिकमध्ये पुन्हा महापुराची भीती आहे. नाशिकच्या तब्बल 11 धरणांमधून एकाच वेळेला विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून 15 हजार क्युसेक, नांदूरमध्यमेशवर धरणामधून 45 हजार क्युसेक, दारणा धरणातून 10 हजार क्युसेक तर पालखेड धरणातून साडेतीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.