AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flood | मुंबईतील दूध पुरवठ्यात जवळपास 50 टक्के घट, रत्नागिरीत दुधाचा टँकर 2 तासात रिकामा

कोल्हापूर-सांगलीतील महापुराचा फटका आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांना बसत आहे.दूध पट्ट्यातील जिल्हे पाण्यात असल्याने तिकडून होणारा दूधपुरवठा थांबला आहे. त्यामुळे  मुंबई, ठाणे, पुण्यात दूध पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे.

Flood | मुंबईतील दूध पुरवठ्यात जवळपास 50 टक्के घट, रत्नागिरीत दुधाचा टँकर 2 तासात रिकामा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 09, 2019 | 10:17 AM
Share

मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचा फटका आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांना बसत आहे.दूध पट्ट्यातील जिल्हे पाण्यात असल्याने तिकडून होणारा दूधपुरवठा थांबला आहे. त्यामुळे  मुंबई, ठाणे, पुण्यात दूध पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात गोकुळ, अमूल, प्रभात, कृष्णा, गोवर्धन यासारखे खासगी दूध मोठ्या प्रमाणावर येते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे तिकडे दूधसंकलन झालंच नाही. शिवाय ज्या टँकरमधून दूध मुंबई-पुण्याकडे पाठवले जाते, ते टँकरही हायवेवरच थांबून आहेत. त्यामुळे दूध पुरवठाच झाला नाही.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद असल्याने दुधाचे टँकर नवी मुंबई किंवा मुंबईत पोहोचू शकलेले नाहीत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दूध संकलन थांबविण्यात आल्याने मुंबईतील दूधपुरवठ्यात जवळपास 5० टक्के  घट झाली आहे.

रत्नागिरीतही दुधाचा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानं कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. या पुराचा फटका रत्नागिरीला बसला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दूधटंचाई निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दुधाचे टँकर जिल्ह्यात पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे दूध मिळेनासे झालं आहे.

दररोज हजारो लिटर दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येत असतं, मात्र काल सकाळी फक्त एक गाडी तब्बल १२ तासांचा प्रवास करून वारणानगरहून रत्नागिरीत पोहचली.  वारणाचे 3 हजार लीटर दूध घेऊन रत्नागिरी शहरामध्ये आलं. मात्र ह्या गाडीला रत्नागिरीत येण्यासाठी तब्बल 12 तासांचा कालावधी लागला.

काल सकाळी 9 च्या सुमारास ही गाडी रत्नागिरी शहरात आली. दूध आलंय हे समजताच दूध घेण्यासाठी ग्राहकांनी वितरकांच्या इथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हे दूध दोन तासांच्या आतच संपलं.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक