AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होणं शक्य, नीति आयोगाच्या बैठकीत मोदी नेमकं काय म्हणाले?

नीति आयोगाच्या गर्व्हनिगं काऊन्सिलची दहावी बैठक नवी दिल्लीत पर पडली. या बैठकीत मोदी यांनी शास्वत विकास, नारीशक्ती, रोजगाराभिमूख प्रशिक्षण, पर्यटन अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

तर विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होणं शक्य, नीति आयोगाच्या बैठकीत मोदी नेमकं काय म्हणाले?
niti aayog meeting
| Updated on: May 24, 2025 | 9:20 PM
Share

Niti Aayog Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदीय यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलची 10 वी शनिवारी (24 मे) पार पडली. नवी दिल्लीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून कसे नावारुपाला आणता येईल, हा या बैठकीचा मुख्य विषय होता. आपल्याला विकासाची गती वाढवावी लागेल. केंद्र तसेच राज्य सरकारने एकत्र येऊन एका टीमप्रमाणे काम केलं तर हे लक्ष्य साध्य करणं अशक्य नाही, असे मत मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केले. विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे लक्ष्य आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित होईल, तेव्हा भारत विकसित होईल. 140 कोटी नागरिकांची हीच अपेक्षा आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रत्येक राज्यात एकतरी जागतिक पर्यटनस्थळ हवे- मोदी

भारतात शहरीकरणाची गती वाढली आहे. भविष्यासाठी तयार असणाऱ्या शहरांना समोर ठेवून आपण काम केलं पाहिजे. विकास, नवोन्मेष तसेच शास्वतता हे आपल्या शहरांच्या विकासासाठीचे इंजिन असायला हवेत. देशातील प्रत्येक राज्याने वैश्विक मानकांना लक्षात घेऊन एकतरी पर्यटनस्थळ विकसित करायला हवे. त्या पर्यटन स्थळांवर सर्व पायाभूत सुविधा असायला हव्यात. एका राज्यात एक जागतिक स्थळ असायलाच हवे. यामुळे त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या शहरांचाही पर्यटन स्थळ म्हणून विकास होईल, असे मत यावेळी मोदी यांनी व्यक्त केले.

युवकांना रोजगार सक्षम प्रशिक्षण द्या- मोदी

नरेंद्र मोदी यांनी नीति आयोगाला एक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी गुंतवणुकीसाठी अनुकूल असणार एक प्लॅन तयार करा, असे निर्देशही दिले. सोबतच जगभरातील गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सर्व राज्यांनी याकडे एक संधी म्हणून पाहावे आणि या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. तसेच पाण्याच्या स्त्रोतांचा योग्य उपयोग व्हावा यासाठी मोदी यांनी राज्यपातळीवर रिव्हर ग्रिड तयार करावेत, अशी सूचनाही मोदी यांनी केली. युवकांना रोजगार सक्षम करण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण द्यावे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. सोबतच महिलांमध्ये असलेल्या शक्तींचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

नीति आयोगाच्या या बैठकीला राज्यांतील मुख्यमंत्री, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री उपस्थित होते. दक्षिण भारतातील काही राज्यांचे मुख्यमंत्री मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.