AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : बहुमताने सरकार आले; रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला, मुनगंटीवारांचा ‘मविआला’ टोला

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आज सत्याचा विजय झाला आहे. बहुमताने सरकार आल्यानंतर लगेच रडण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : बहुमताने सरकार आले; रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला, मुनगंटीवारांचा 'मविआला' टोला
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 04, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने (BJP) सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानभवनात चांगलीच खडाजंगी रंगल्याचे पहायला मिळाले. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी एकोंमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मविआच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. बहुमताने सरकार आले आणि रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार.

सत्याचा विजय झाला

आज सत्याचा विजय झाला आहे. बहुमताने सरकार आल्यानंतर लगेच रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला.  या सरकारने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. रामाला काल्पनिक म्हणाऱ्यांसोबत तुम्ही आघाडी केली. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले आहे. आम्ही भगवा हातात घेतला आहे. मात्र तुम्हाला भगव्याचा अर्थ समजणार नाही. हा वासनारहित भगवा आहे. काही लोकांनी तर आतापासूनच माजी आमदार होण्याची तयारी सुरू केली आहे. त्या आमदारांच्या पेन्शमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात यावा. आज मी अनेकांच्या चेहऱ्यावर अभिनंदनाऐवजी सत्ता गेल्याचे दु:ख पाहिले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली  आहे.

एकनाथ शिंदेंचे कौतुक

दरम्यान यावेळी बोलताना सुधीर  मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचं व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यामुळे आज पुन्हा युती झाली. जनतेने 2019 मध्ये भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमताने कौल दिला होता. मात्र त्यावेळी शिवसेना काल्पनिक कथानक वाटण्यांसोबत गेली. मात्र पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार आले आहे. ज्या 40 आमदारांनी या कामात मदत केली त्यांचे देखील मी आभार मानतो, असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?