AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : बहुमताने सरकार आले; रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला, मुनगंटीवारांचा ‘मविआला’ टोला

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आज सत्याचा विजय झाला आहे. बहुमताने सरकार आल्यानंतर लगेच रडण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : बहुमताने सरकार आले; रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला, मुनगंटीवारांचा 'मविआला' टोला
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 04, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने (BJP) सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानभवनात चांगलीच खडाजंगी रंगल्याचे पहायला मिळाले. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी एकोंमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मविआच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. बहुमताने सरकार आले आणि रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार.

सत्याचा विजय झाला

आज सत्याचा विजय झाला आहे. बहुमताने सरकार आल्यानंतर लगेच रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला.  या सरकारने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. रामाला काल्पनिक म्हणाऱ्यांसोबत तुम्ही आघाडी केली. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले आहे. आम्ही भगवा हातात घेतला आहे. मात्र तुम्हाला भगव्याचा अर्थ समजणार नाही. हा वासनारहित भगवा आहे. काही लोकांनी तर आतापासूनच माजी आमदार होण्याची तयारी सुरू केली आहे. त्या आमदारांच्या पेन्शमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात यावा. आज मी अनेकांच्या चेहऱ्यावर अभिनंदनाऐवजी सत्ता गेल्याचे दु:ख पाहिले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली  आहे.

एकनाथ शिंदेंचे कौतुक

दरम्यान यावेळी बोलताना सुधीर  मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचं व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यामुळे आज पुन्हा युती झाली. जनतेने 2019 मध्ये भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमताने कौल दिला होता. मात्र त्यावेळी शिवसेना काल्पनिक कथानक वाटण्यांसोबत गेली. मात्र पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार आले आहे. ज्या 40 आमदारांनी या कामात मदत केली त्यांचे देखील मी आभार मानतो, असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.

मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.