AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या

शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या
| Updated on: Jan 18, 2020 | 2:52 PM
Share

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरु असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘सावरकरांना विरोध करणाऱ्यांना दोन दिवस जेलमध्ये ठेवावे’, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता या वादत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊतांचे आजचे विधान आहे की, सावरकरांना विरोध करणाऱ्या सर्वांना जेलमध्ये पाठवले पाहिजे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डसोबत घनिष्ठ संबंध होते. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे बोलत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का?  उद्धव ठाकरे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“सावरकरांनी आयुष्याची 14 वर्षे अंदमानच्या तुरुंगात घातली. ही असामान्य गोष्ट या देशात घडली आहे. त्यांना त्यावेळी 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यावेळी त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. नंतर ते बाहेर आले. जे लोक त्यांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करतात, ते कुणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो या सर्वांना दोन दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मग त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला, संघर्ष केला आणि बलिदान दिलं हे कळेल”, असे संजय राऊत म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.