AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या

शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या
| Updated on: Jan 18, 2020 | 2:52 PM
Share

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरु असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘सावरकरांना विरोध करणाऱ्यांना दोन दिवस जेलमध्ये ठेवावे’, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता या वादत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊतांचे आजचे विधान आहे की, सावरकरांना विरोध करणाऱ्या सर्वांना जेलमध्ये पाठवले पाहिजे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डसोबत घनिष्ठ संबंध होते. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे बोलत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का?  उद्धव ठाकरे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“सावरकरांनी आयुष्याची 14 वर्षे अंदमानच्या तुरुंगात घातली. ही असामान्य गोष्ट या देशात घडली आहे. त्यांना त्यावेळी 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यावेळी त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. नंतर ते बाहेर आले. जे लोक त्यांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करतात, ते कुणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो या सर्वांना दोन दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मग त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला, संघर्ष केला आणि बलिदान दिलं हे कळेल”, असे संजय राऊत म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.