AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?

India Women vs Pakistan Women: आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उभयसंघातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना कोणत्या शक्यतेमुळे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे? जाणून घ्या.

IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?
Harmanpreet Kaur and Fatima Sana IND vs PAKImage Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 12:32 PM
Share

क्रिकेट विश्वात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा पाहायला मिळतेय. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी तीव्र भावना भारतीयांची आहे. मात्र केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे मेन्स टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत खेळली. टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम सामन्यासह एकूण 3 वेळा पराभूत केलं. टीम इंडियाने तिन्ही वेळा या पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलन टाळलं. त्यानंतर बीसीसीआयने वूमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध हँडशेक करु नये,असे आदेश दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान वूमन्स यांच्यातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सहावा सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो. चाहत्यांना हा सामना रद्द होऊ शकतो याची झलक 4 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून पाहायला मिळाली. उभयसंघातील या सामन्यात पावसाने खोडा घातला. परिणामी हा सामना रद्द करावा लागला. हा सामना नाणेफेकीशिवाय रद्द करावा लागला. त्यानंतर आता काही तासांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नियोजित आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

कोलंबोत पावसाची बॅटिंग

कोलंबोत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. शनिवारी 4 ऑक्टोबरला पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर आता काही तासांनी भारत-पाकिस्तान सामना नियोजित आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामनाही रद्द होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एक्युवेदरनुसार, कोलंबोत रविवारी सकाळी जोरदार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला आहे. कोलंबोत सकाळी 8 ते 10 तसेच 11 ते 12 दरम्यान पाऊस होईल, अशी अंदाज होता. दुपारी 1 नंतर पावसाची शक्यता कमी होत जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...