AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?

India Women vs Pakistan Women: आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उभयसंघातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना कोणत्या शक्यतेमुळे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे? जाणून घ्या.

IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?
Harmanpreet Kaur and Fatima Sana IND vs PAKImage Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 12:32 PM
Share

क्रिकेट विश्वात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा पाहायला मिळतेय. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी तीव्र भावना भारतीयांची आहे. मात्र केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे मेन्स टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत खेळली. टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम सामन्यासह एकूण 3 वेळा पराभूत केलं. टीम इंडियाने तिन्ही वेळा या पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलन टाळलं. त्यानंतर बीसीसीआयने वूमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध हँडशेक करु नये,असे आदेश दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान वूमन्स यांच्यातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सहावा सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो. चाहत्यांना हा सामना रद्द होऊ शकतो याची झलक 4 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून पाहायला मिळाली. उभयसंघातील या सामन्यात पावसाने खोडा घातला. परिणामी हा सामना रद्द करावा लागला. हा सामना नाणेफेकीशिवाय रद्द करावा लागला. त्यानंतर आता काही तासांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नियोजित आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

कोलंबोत पावसाची बॅटिंग

कोलंबोत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. शनिवारी 4 ऑक्टोबरला पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर आता काही तासांनी भारत-पाकिस्तान सामना नियोजित आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामनाही रद्द होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एक्युवेदरनुसार, कोलंबोत रविवारी सकाळी जोरदार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला आहे. कोलंबोत सकाळी 8 ते 10 तसेच 11 ते 12 दरम्यान पाऊस होईल, अशी अंदाज होता. दुपारी 1 नंतर पावसाची शक्यता कमी होत जाईल.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत