AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRAI Telecom | ओ भाऊ, 28 दिवसांचा नाही, 30 दिवसांचा रिचार्ज, काय म्हणाले TRAI?

TRAI Telecom | मोबाईल यूजर्संना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल रिचार्जची वैधता दोन दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ट्रायने सर्व मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

TRAI Telecom | ओ भाऊ, 28 दिवसांचा नाही, 30 दिवसांचा रिचार्ज, काय म्हणाले TRAI?
30 दिवसांचा रिचार्जImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 13, 2022 | 11:11 AM
Share

TRAI Telecom | मोबाईल यूजर्संना (Mobile Users) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल रिचार्जची वैधता (Recharge Validity) दोन दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ट्रायने सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत.

28 नव्हे 30 दिवसांचा रिचार्ज

ट्रायने मोबाईल कंपन्यांना रिचार्ज कालावधी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, दोन दिवसांनी हा कालावधी वाढवण्यास सांगण्यात आले आहे. आता 28 नव्हे 30 दिवसांचा रिचार्ज करण्याचे निर्देश मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दुसऱ्यांदा निर्देश

TRAI ने मोबाईल रिचार्ज वैधतेविषयी यापूर्वीही निर्देश दिले होते. परंतु, टेलिकॉम कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ट्रायने पुन्हा निर्देश दिले आहेत.

28 दिवसांची वैधता

सध्या टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना सध्या जो रिचार्ज प्लॅन देत आहेत. तो 28 दिवसांच्या वैधतेचा आहे. तो संपूर्ण महिन्यांचा म्हणजे 30 दिवसांचा नाही.

काय होतो तोटा

सध्याच्या प्लॅनवर 28 दिवसांची वैधता मिळते. त्या हिशोबाने 12 महिन्यांसाठी ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज मारावा लागतो. म्हणजे एका महिन्याची रक्कम नाहक रिचार्जसाठी खर्च करावी लागते.

एक रिचार्ज वाचेल

ट्रायच्या या निर्देशांची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक ग्राहकांचे वर्षाकाठी एक रिचार्ज वाचेल. त्यामुळे एका महिन्यासाठीचा नाहकचा खर्च वाचेल.

टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालवधी

TRAI ने या निर्देशांचे पालन करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालवधी दिला आहे. त्यासाठी ट्रायने अधिसूचनाही काढली आहे.

काय म्हटले आहे ट्रायने

TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल रिचार्चसाठी 30 दिवसांची वैधता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

28 दिवसांवरुन अनेक तक्रारी

28 दिवसांच्या वैधतेवरुन देशभरातून ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची ट्रायने दखल घेतली. कंपन्यांच्या या खेळीमुळे वर्षाकाठी एका महिन्याचा जास्तीचा रिचार्ज करावा लागतो आणि त्याचा भूर्दंड सहन करावा लागतो अशी तक्रार ग्राहकांनी केली होती.

Follow Us
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?