AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दुष्काळातही सन्मानानं कसं जगायचं याचा आदर्श ‘या’ लोकांनी दाखवला”; शरद पवार यांनी या लोकांबद्दल गौरवोद्गगार काढले…

शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दुष्काळातही सन्मानानं कसं जगायचं याचा आदर्श 'या' लोकांनी दाखवला; शरद पवार यांनी या लोकांबद्दल गौरवोद्गगार काढले...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: May 07, 2023 | 7:20 PM
Share

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करणाऱ्या शरद पवार यांचा आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मेडशिंगे येथे कार्यक्रमाासाठी आले असताना त्यांनी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची आढावा घेताना दुष्काळ वाईट असला तरी त्यातून संघर्ष निर्माण करण्याची ताकद कशी येते हे सुद्धा शरद पवार यांनी दुष्काळजन्य परिस्थितीच्या भागातील उदाहरणं देऊन सांगितले. याप्रसंगी शरद पवार यांनी सांगितले की, दुष्काळ असताना पण त्यावर मात करून सन्मानाने कसं जगायचे यांचा आदर्श काही भागातील लोकांनी दाखवला. त्यामध्ये संगोल्याचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिथं दुष्काळीजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून जगण्याची संभावना अधिक जास्त असते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांचे मोठेपण सांगताना ते म्हणाले की, देशभरात सोन्या चांदीचे काम करणारे लोकं ही दुष्काळी भागातील आहे.

विटा, तासगाव, सांगोला भागातील लोकं दिल्ली तसेच इतर ठिकाणी भेटत असतात. या भागातील लोकं देशात कुठेही सोने विकायचे काम करतात आणि राहतात पण घरात सून आपल्या भागातीलच आणतात असंही त्यांनी यावेळी सांगितले. संकट काळात चांगली कामं होत असतात.

त्यामध्ये दुष्काळी भागाचा समावेश असतो, त्यामुळे अशी कामं ही सांगोल्यातील लोकांनी केली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अलीकडच्या काळात जैविक शेती पुढे आली आहे, त्यामुळे जैविक शेतीमध्ये उत्पन्न कमी असले तरी ते पण चांगली शेती होती असंही त्यांनी शेतीविषयी बोलताना सांगितले.

जैविक उत्पादन करणारे शेतकरी अनेक दुकानं असल्याचे सांगत आज शहरी भागात पुणेकर यांना माहिती आहे मात्र उत्पादन पाहिजे असेल तर ते जैविक दुकानातून घेतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संशोधन आणि निष्कर्ष अशा दोन गोष्टींची आज शेतीला गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जो उत्तम शेती करतो, त्याला अशा माती परीक्षण प्रयोगशाळेचा फायदा होणार असल्याचे सांगत त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेचं महत्वंही अधोरेखित केले.

शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय