AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दुष्काळातही सन्मानानं कसं जगायचं याचा आदर्श ‘या’ लोकांनी दाखवला”; शरद पवार यांनी या लोकांबद्दल गौरवोद्गगार काढले…

शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दुष्काळातही सन्मानानं कसं जगायचं याचा आदर्श 'या' लोकांनी दाखवला; शरद पवार यांनी या लोकांबद्दल गौरवोद्गगार काढले...
| Edited By: | Updated on: May 07, 2023 | 7:20 PM
Share

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करणाऱ्या शरद पवार यांचा आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मेडशिंगे येथे कार्यक्रमाासाठी आले असताना त्यांनी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची आढावा घेताना दुष्काळ वाईट असला तरी त्यातून संघर्ष निर्माण करण्याची ताकद कशी येते हे सुद्धा शरद पवार यांनी दुष्काळजन्य परिस्थितीच्या भागातील उदाहरणं देऊन सांगितले. याप्रसंगी शरद पवार यांनी सांगितले की, दुष्काळ असताना पण त्यावर मात करून सन्मानाने कसं जगायचे यांचा आदर्श काही भागातील लोकांनी दाखवला. त्यामध्ये संगोल्याचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिथं दुष्काळीजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून जगण्याची संभावना अधिक जास्त असते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांचे मोठेपण सांगताना ते म्हणाले की, देशभरात सोन्या चांदीचे काम करणारे लोकं ही दुष्काळी भागातील आहे.

विटा, तासगाव, सांगोला भागातील लोकं दिल्ली तसेच इतर ठिकाणी भेटत असतात. या भागातील लोकं देशात कुठेही सोने विकायचे काम करतात आणि राहतात पण घरात सून आपल्या भागातीलच आणतात असंही त्यांनी यावेळी सांगितले. संकट काळात चांगली कामं होत असतात.

त्यामध्ये दुष्काळी भागाचा समावेश असतो, त्यामुळे अशी कामं ही सांगोल्यातील लोकांनी केली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अलीकडच्या काळात जैविक शेती पुढे आली आहे, त्यामुळे जैविक शेतीमध्ये उत्पन्न कमी असले तरी ते पण चांगली शेती होती असंही त्यांनी शेतीविषयी बोलताना सांगितले.

जैविक उत्पादन करणारे शेतकरी अनेक दुकानं असल्याचे सांगत आज शहरी भागात पुणेकर यांना माहिती आहे मात्र उत्पादन पाहिजे असेल तर ते जैविक दुकानातून घेतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संशोधन आणि निष्कर्ष अशा दोन गोष्टींची आज शेतीला गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जो उत्तम शेती करतो, त्याला अशा माती परीक्षण प्रयोगशाळेचा फायदा होणार असल्याचे सांगत त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेचं महत्वंही अधोरेखित केले.

शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.