AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पाणी बंद केले तर आम्ही तुमचा श्वास बंद करु’, दहशतवादी हाफिज सईद याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

तुम्ही पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा श्वास बंद करु. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील, अशी धमकी देणारा हाफिज सईद याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा दावा केला जात आहे.

'पाणी बंद केले तर आम्ही तुमचा श्वास बंद करु', दहशतवादी हाफिज सईद याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
hafiz saeed
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 24, 2025 | 5:29 PM
Share

Indus Water Treaty: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दशतवादी हल्ला मंगळवारी झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले. भारताने सिंधू नदी करार रद्द केला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओतून हाफिज सईद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. “जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास थांबवून टाकू. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील”, अशी धमकी देणारा हाफिज सईद याचा व्हिडिओ आहे.

दहशतवादी हाफिज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल करून पाकिस्तान भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दहशतवादी हाफिज सईद भारताविरुद्ध विष ओकत आहे. तो म्हणतो, ‘मोदी तुम्ही ढाका विद्यापीठात बांगलादेशमध्ये म्हणाला, पाकिस्तान आम्ही तोडले. तुम्ही बोलोल तर आम्ही बोलू. तुम्ही म्हणता की पाकिस्तानचे पाणी थांबवाल. काश्मीरमध्ये धरणे बांधून पाणी आडवाल. तुम्हाला पाकिस्तानला उद्धवस्थ करायचा आहे. तुम्हाला चीन-पाकिस्तान कॉरिडॉरच्या योजना उधळून लावायच्या आहेत. तुम्ही पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा श्वास बंद करु. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील.’ हा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा दावा केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना परत बोलावले आहे. तसेच सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला आहे.

सिंधू पाणी करारानंतर भारताने अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने अटारी सीमा देखील बंद केली आहे. भारताच्या कठोर उपाययोजनांनंतर पाकिस्तानकडून शुक्रवारी काही निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानने भारताला त्यांची एअर स्पेस वापरण्यास बंदी केली आहे.

Follow Us
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल.
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?.
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा.
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.