AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी ‘या’ पद्धतीचा करा अवलंब

उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, म्हणून ते नेहमी झाकून आणि थंड जागी ठेवणे फायद्याचे ठरते. कारण अन्न शिजवल्यानंतर ते ताबडतोब फ्रीजमध्ये ठेवा किंवा थंड करून ठेऊ शकता. दही, दूध आणि भात यांसारखे अन्नपदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात लवकर खराब होतात, म्हणून हे पदार्थ वेळेत सेवन करून घ्यावे. यातील बॅक्टेरिया वाढू नयेत म्हणून कोणते उपाय करावेत ते आपण या लेखात जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी 'या' पद्धतीचा करा अवलंब
अन्नपदार्ध नाही खराब होणारImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 3:55 PM
Share

उन्हाळ्यात अन्न खूप लवकर खराब होते. तापमान वाढत असताना बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि अन्नातील ताजेपणा कमी होतो. तर या दिवसांमध्ये बऱ्याचदा सकाळी बनवलेले अन्न दुपारपर्यंत खराब होते. यामुळे अन्न वाया जातेच पण आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अन्नातून विषबाधा, पोटदुखी, जुलाब यासारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

सर्वप्रथम स्वयंपाक केल्यानंतर अन्न जास्त वेळ उघडे ठेवू नका. ते उघड्यावर ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया लवकर वाढतात. अन्न थंड होताच ते झाकून ठेवा आणि गरज नसल्यास लगेच फ्रीजमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे रेफ्रिजरेटर नसेल तर अन्न थंड ठिकाणी ठेवा, जसे की कूलर असलेल्या खोलीत जेणेकरून त्याचे तापमान कमी राहील. शिजवलेले अन्न नेहमी स्वच्छ भांड्यात ठेवा. प्लास्टिकपेक्षा स्टील किंवा काचेची भांडी अधिक सुरक्षित असतात.

या सोप्या टिप्स वापरून पहा

– स्वयंपाक करताना भांडी पूर्णपणे धुऊनच वापरा कारण यात ठेवलेले अन्न लवकर खराब होत नाही. तसेच एखाद्या भांड्यात अन्न गरम ठेवताना त्याला वारंवार स्पर्श न करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही अन्नाला वारंवार स्पर्श करून बाहेर काढले तर त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते.

– उन्हाळ्याच्या दिवसात भात, डाळ आणि भाज्या यासारख्या गोष्टी लवकर खराब होतात, विशेषतः जर त्यात जास्त पाणी असेल तर. अशा वेळेस या गोष्टी पूर्णपणे शिजवा जेणेकरून त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होईल.

– उरलेले अन्न पुन्हा जर जेवताना त्यांचा ते चांगले गरम करा. गरम केल्याने हानिकारक जीवाणू मरतात आणि अन्न सुरक्षित राहते.

-जर तुम्ही ऑफिस किंवा पिकनिकसाठी कुठेतरी बाहेर जेवण घेऊन जात असाल तर ते हवाबंद डब्यात पॅक करा. तसेच, अन्न थंड होऊ नये म्हणून इन्सुलेटेड बॅग्ज किंवा थर्मल कॅरियर्स वापरा. यामुळे अन्न बराच काळ ताजे राहते.

– दही, रायता यासारख्या थंड पदार्थ जास्त काळ बाहेर ठेवू नका, कारण उन्हाळयात वातावरणातील दमटपणामुळे आंबट होतात आणि लवकर खराब होतात. स्वयंपाक करताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. हात धुतल्यानंतरच अन्न शिजवा आणि स्वयंपाकघरातील पृष्ठभाग देखील स्वच्छ ठेवा.

– भाज्या आणि डाळी पूर्णपणे धुऊनच शिजवा. कधीकधी अन्न खराब होणे हे त्याच्या कच्च्या घटकांमध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे देखील होऊ शकते. घरी किती अन्न शिजवता याची काळजी घ्या. आवश्यक तेवढेच अन्न तयार करा जेणेकरून ते वारंवार साठवण्याची गरज भासू नये. उन्हाळ्यात बनवलेले अन्न सर्वोत्तम असते. थोडीशी काळजी घेऊन आणि योग्य पद्धत अवलंबून, तुम्ही अन्न दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकत नाही तर स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य देखील सुरक्षित ठेवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?