AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॉटरिचेबल राहूनही शुभांगी पाटील यांनी केली जंगी मिरवणुकीची तयारी; तांबे मात्र भाजपच्या आशेवर कायम…

शुभांगी पाटलांना मातोश्रीवर बोलावून ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांच्या खेळीला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कृत्तीतून त्यांनी उत्तर दिलं आहे.

नॉटरिचेबल राहूनही शुभांगी पाटील यांनी केली जंगी मिरवणुकीची तयारी; तांबे मात्र भाजपच्या आशेवर कायम...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 16, 2023 | 11:13 PM
Share

नाशिकः नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरे गटानं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील अर्ज मागे घेणार की काय ?, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र त्या नॉटरिचेबल राहून शुभांगी पाटलांना अर्ज मागे घेतलाच नाही. तर सत्यजित तांबे यांच्या भाजपच्या पाठिंब्यावरुन सस्पेंस कायम आहे.

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही शेवटच्या मिनिटांपर्यंत राजकीय ड्रामा रंगला होता. ठाकरे गटानं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटलांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती, पण शुभांगी पाटलांनी काही अर्ज मागे घेतला नाही.

तर 3 अपक उमेदवारांनी मात्र अर्ज मागे घेतले आहेत. धनराज विसपुते , धनंजय जाधव आणि अॅड. सुधीर सुरेश तांबे या अपक्ष उमेदवारानीही अर्ज मागे घेतले आहेत. तर नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत प्रमुख लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे नाशिकात तिहेरी लढत होणार आहे.

सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. सत्यजित तांबे अपक्ष असून त्यांना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. तर अपक्ष सुभाष जंगलेही मैदानात असल्याने त्यांच्यामुळे चुरस वाढली आहे.

नाशिकमध्ये तिहेरी लढत निश्चित झाली असली तरी शेवटच्या मिनिटांपर्यंत ड्रामा पाहायला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जे काही घडलं आहे, तशाच प्रकारच्या घडामोडी अर्ज मागे घेणार त्या दिवशीही घडल्या आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत कोण अर्ज मागे घेणार यावरुनच आता सस्पेंस वाढला होता.

सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत होणार हे निश्चितच झाले होतं, त्यामुळं शुभांगी पाटलांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपनं प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

पण शुभांगी पाटील सकाळपासून नॉटरिचेबल होत्या.शुभांगी पाटील नॉटरिचेबल झाल्यानं आणखी धाकधूक वाढली होती. त्या अर्ज मागे घेतात की काय ?, अशीही चर्चा सुरु झाली मात्र शुभांगी पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही, आणि दुपारी 3 वाजताच्या नंतरच त्या माध्यमांसमोर आल्या.

नॉटरिचेबलवरुन शुभांगी पाटलांनी सूचक विधानही केलं आहे की, मला धमकी आली होती की नाही, हे कळलच असेल अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटलांनी दिली आहे.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी होती, त्या दिवशी तर मोठा उलटफेर झाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही.

तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अर्जही दाखल केला. इकडे भाजपच्या शुभांगी पाटील भाजपकडून उमेदवारीसाठी उच्छुक होत्या. पण त्यांना भाजपनं शेवटच्या मिनिटांपर्यंत एबी फॉर्म दिलाच नाही.

त्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वडिलांना थांबवत, सत्यजित ताबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि भाजपकडे जाहीरपणे पाठिंबाही मागितला, याकडे फडणवीसांची खेळी म्हणून पाहिलं जातं आहे.

तर शुभांगी पाटलांना मातोश्रीवर बोलावून ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांच्या खेळीला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कृत्तीतून त्यांनी उत्तर दिलं आहे.

त्यामुळे आता आता सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा सामना रंगणार आहे. आपल्याला ठाकरे गटाला पाठिंबा असून, महाविकास आघाडीचाही पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी आणखी ट्विस्ट आला आहे. भाजपला पाठींबा मागितला नाही आणि मागणारही नाही, असं सुधीर तांबे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे 12 तारखेला अर्ज दाखल करताच, सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिब्ंयाची मागणी केली आहे.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?