AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा

अहमद पटेल यांच्या निधनांनंतर त्यांची भूमिका प्रियांका गांधी पार पाडत असल्याचं बोललं जातेय. (Priyanka Gandhi Ahmed Patel)

भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा
प्रियंका गांधी, महासचिव, काँग्रेस
| Updated on: Dec 21, 2020 | 1:21 PM
Share

नवी दिल्ली: प्रियांका गांधींच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील वाद शांत होताना दिसत आहेत. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांच्या निधनांनंतर काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली होती. प्रियांका गांधी अहमद पटेलांची भूमिका निभावत आहेत, असं राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. प्रियांका गांधींनी काँग्रेस नेतृत्व आणि  23 वरिष्ठ नेते यांच्यातील तणाव देखील कमी करण्याचा प्रयत्न केला, असल्याचं बोललं जातेय. (Priyanka Gandhi bridges gap between Senior leaders after Ahmed Patel death)

टाईम्स ऑफ इंडियांच्या वृत्तानुसार प्रियांका गांधी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसच्या वरिष्ठ 23 नेत्यांशी चर्चा केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल(Ahmed Patel) यांना श्रद्धांजली देताना प्रियांका गांधींनी सर्व नेत्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद वाढवला.

प्रियांका गांधींच्या प्रयत्नाने 23 नेत्यांसोबत बैठक

प्रियांका गांधींच्या प्रयत्नांमुळे शनिवारी (19 डिसेंबरला) पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा यासाठी पत्र लिहिणाऱ्या नेंत्यांची आणि काँग्रेस नेतृत्वाची बैठक शक्य झाली, असं म्हटलं जात आहे. ऑगस्ट महिन्यात पक्षनेतृत्वाला पत्र लिहेलल्या नेत्यांनी बैठक यशस्वी झाल्याचे सांगितले होते. ऑगस्टमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल सहीत काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं.

राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबवण्यात यश

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये जून महिन्यात तणाव निर्माण झाला होता. यानंतर राजस्थान सरकारला धोका निर्माण झाला होता. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्यांशी चर्चा करुन त्यांना काँग्रेसमध्येच थांबवण्यात यश मिळवले. यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारला असणारा धोका कमी झाला.

राहुल गांधींकडे पुन्हा अध्यक्षपद?

काँग्रेसच्या पत्र लिहीणाऱ्या 23 नेत्यांची बैठक 10 जनपथ येथे झाली होती. याबैठकीला सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुड्डा, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींनी पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास तायर असल्याचे राहुल गांधींनी सांगितले होते. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे.

अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल 25 नोव्हेंबरला  निधन झालं. अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. अहमद पटेल काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असायची.

संबंधित बातम्या:

Congress: काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?

(Priyanka Gandhi bridges gap between Senior leaders after Ahmed Patel death)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.