AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक

कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली गोलंदाजी करतील यात शंका नाही.

T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक
TEAM INDIA WINImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 26, 2022 | 9:39 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलियाच्या टीमचा (Australia Team) दणदणीत पराभव केला. काल फलंदाजांनी अचूक शॉट खेळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. पहिली मॅच ऑस्ट्रेलिया टीमने जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. कालचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पुन्हा टीम इंडिया जबरदस्त फॉर्म असल्याचे सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात केएल राहूल (KL Rahul) सोडला तर सगळ्या फलंदाजांनी आपली चांगली खेळी केली. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) सुरेख भागीदारीमुळे कालचा विजय सहज शक्य झाला.

1 कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली फलंदाजी करतील यात शंका नाही. परंतु केएल राहूल सुरुवातीला मोठी समस्या झाली आहे. केएल राहूलला आत्तापर्यंत सूर गवसलेला नाही.

2 दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला अद्याप लय सापडलेली नाही. कारण कालच्या मॅचमध्ये बुमराहने चार ओव्हरमध्ये पन्नासच्या वरती धावा दिल्या, त्यामुळे त्याची कामगिरी सुध्दा खराब झाली आहे.

3 भुवनेश्वर कुमारने आत्तापर्यंत आशिया चषकापासून चांगली कामगिुरी केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीका केली जात आहे. झालेल्या तीन सामन्यात सुद्धा त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी झालेली नाही.

4 अंतिम ओव्हर सुरु असताना टीम इंडियाकडून अधिक धावा दिल्या जात आहेत. त्याला आवर घालणे गरजेचे आहे. कारण आशिया चषकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अंतिम ओव्हरमध्ये खराब कामगिरी केली आहे.

5 फिल्डींगमध्ये सुद्धा अधिक प्लेअर कमजोर असल्याचं मागच्या तीन सामन्यातून समोर आलं आहे. चांगल्या खेळाडूंनी खराब फिल्डींग केली आहे. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे कॅच सुद्धा सोडले आहेत.

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.