AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोठा वाटतोय की काय? याला शाळा म्हणायचं!! इथं उंट, गाई, म्हशी, डबकं सगळंच दिसेल… मालेगाव मनपानं किती छान काळजी घेतलीय पहा…

मालेगाव येथील केवळ एकाच शाळेची अशी दुरवस्था झालेली नाही. तर इतर शाळादेखील विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. अनेक शाळेची तर तुटलेली दारे फरच्यांची दुरवस्था, भिंतींना तडे यासह इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.

गोठा वाटतोय की काय? याला शाळा म्हणायचं!! इथं उंट, गाई, म्हशी, डबकं सगळंच दिसेल... मालेगाव मनपानं किती छान काळजी घेतलीय पहा...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 13, 2022 | 4:25 PM
Share

नाशिक (मालेगाव) : खासगी शाळांमध्ये (Private Schools) शिक्षण घेणं गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी आवाक्याबाहेर होत आहे. त्यामुळे अनेक पालक सध्या महालिकेच्या शाळांकडे वळतायत. पण राज्यातील काही मनपांच्या शाळांचं चित्र पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 15 जूनपासून शाळा सुरु होणार म्हटल्यावर मालेगाव मनपा शाळेतील (Malegaon School) शिक्षक दोन दिवस आधी साफसफाईसाठी शाळेत पोहोचले. पण शाळेचं हे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. इथली जनावरं पाहून ही शाळा आहे की गोठा, असाच प्रश्न पडतोय. मालेगाव शहरातील ही प्राथमिक शाळा आहे. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळेचं रूपांतर थेट गोठ्यात झाले आहे.

Malegaon School

शाळेच्या आवारात उंटही बांधलाय

नाशिक जिल्हा व मालेगाव शहरात 15 जून पासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या अगोदर मनपा शाळेचे शिक्षक साफफाईसाठी साठी शाळेत पोहचली मालेगाव मनपाच्या अनेक शाळांची अवस्था बघून शिक्षकही अवाक झालेत.

Malegaon School

उद्यानंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत, त्यांना बसायला जागा नाही, शाळेची दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणी शाळेत आणि शाळेच्या आवारात गुरे बांधली आहेत. विशेष म्हणजे एका शाळेच्या आवारात उंट देखील बांधलेला आहे. मनपाच्या शाळांची अशी दयनीय अवस्था बघून अशा शाळांमध्ये गरीब विद्यार्थी कसे शिक्षण घेत असतील याचा विचार करायला लावणारी बोलकी परिस्थिती समोर आली आहे.

तुटलेली दारं, भगदाड पडलेल्या भिंती

मालेगाव येथील केवळ एकाच शाळेची अशी दुरवस्था झालेली नाही. तर इतर शाळादेखील विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. अनेक शाळेची तर तुटलेली दारे फरच्यांची दुरवस्था, भिंतींना तडे यासह इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.

Malegaon School

पालकांचा संताप

मालेगाव येथील शाळांची अशी दुरवस्था पाहून पालक आणि शिक्षकांचा प्रचंड संताप झाला आहे. महापालिका प्रशासनानं शाळांकडे केलेलं  दुर्लक्ष संतापदायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच शाळांच्या या स्थितीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर