मी स्वच्छ, मला कशाचीही भीती नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ईडीला खुशाल द्यावेत : प्रताप सरनाईक

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मी स्वच्छ, मला कशाचीही भीती नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ईडीला खुशाल द्यावेत : प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 7:39 PM

मुंबई : माझ्यावर कोणताही डाग नाही, मी स्वच्छ आहे, ज्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे असतील त्यांनी ते पुरावे सक्तवसुली संचनलनालयाकडे (ED) खुशाल द्यावेत, मला कोणाचीही भीती नाही, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने त्यांना चौकशीसाठीदेखील बोलावले आहे. याबाबत सरनाईक माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपण कोणताही गुन्हा/घोटाळा केला नसल्याचे सांगितले. (I am clean, I am not afraid of anything, those who have evidence should give it to ED : Pratap Saranaik)

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तसं पत्र त्यांनी गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, “टॉप्स सिक्युरिटी असो वा अजून काही काही यात मला कोणतीही भीती नाही, मी स्वच्छ आहे. माझ्यावर एकही डाग नाही, ज्या कुणाकडे पुरावे असतील, त्यांनी ते ED कडे सोपवावेत. मला काहीही फरक पडत नाही. कौटूंबिक कारणास्तव मी ED कडे वेळ मागितला आहे. कुटुंब म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, काही कामेदेखील असतात, त्यासाठी मी वेळ मागितला आहे”.

सरनाईक म्हणाले की, “मी महाराष्ट्रातील एक जबाबदार आमदार आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. माझे विजय माल्ल्या किंवा नीरव मोदीसारखे नाही, मी स्वतःहून ED कडे जाईन. तसेच माझा मुलगा विहंग याचा कुठेही उल्लेख नाही. रिमांडमध्ये केवळ प्रताप सरनाईक या एकाच नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे मीडियाने विहंग यांचे नाव घेणे योग्य नाही. मी बाहेरगावी होतो त्यामुळे विहंग याना ED ने नेले”.

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे सांगताना हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी यावेळी केला.

प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी तानाजी मालुसरे सारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल. माझी संपत्ती एवढी मोठी असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच पराग शहा, सुधाकर शेट्टी, मंगलप्रभात लोढा, अर्णव गोस्वामी यांची संपत्तीही अमाप आहे, असं ते म्हणाले. अभिनेत्री कंगना रणौतची संपत्ती तपासली का? हिमाचलची पोरगी मुंबईत संपत्ती कमावते. त्याचे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सरनाईक म्हणाले की, “जे आरोप होताहेत त्यामध्ये मला गोवण्यात आले आहे. सर्वजण म्हणतायत की, 175 कोटींचा घोटाळा आहे. परंतु एवढे मोठे घोटाळे करुन चोर लंडनला जातात. मी कुठेही गेलेलो नाही. ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, मी त्यांच्याशी बोललो. मी शिवसेनेचा आमदार आहे, मला सेनेने बनवले आहे. मी सेनेत आमदार म्हणून राहीन आणि मी माझी भूमिका ठामपणे मांडेन”.

ईडी सांगेल तेव्हा चौकशीला जाईन

मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले.

भाजप विरुद्ध आघाडी लढाई

ही लढाई भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भाजपच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार पाच नव्हे 25 वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

जे होईल ते योग्यच होईल: विहंग

यावेळी विहंग सरनाईक यांनीही मीडियाशी संवाद साधला. जे होईल ते योग्यच होईल. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया विहंग यांनी व्यक्त केली. माझी पत्नी आजारी असल्याने मी ईडीच्या चौकशीला जाऊ शकलो नाही. मी ईडीला पत्रं लिहून कळवलं होतं. पण तरीही नोटिसा पाठवत राहिले. त्यांनी समन्स बजावले आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असं सांगतानाच काय बरोबर आणि काय चूक हे लोकांनीच ठरवावं असंही ते म्हणाले. (pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

कोण आहेत प्रताप सरनाईक?

(I am clean, I am not afraid of anything, those who have evidence should give it to ED : Pratap Saranaik)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.