AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेब का आशीर्वाद है; सुरेस धस यांची आष्टीत तुफान टोलेबाजी

आष्टीत उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश धस यांचा आधुनिक भगिरथ असा देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी जोरदार भाषण केले.

मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेब का आशीर्वाद है; सुरेस धस यांची आष्टीत तुफान टोलेबाजी
| Updated on: Feb 05, 2025 | 3:09 PM
Share

भाजपाचे बीडचे आमदार सुरेश धस सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने ते कायम टीव्हीवर झळकत आहेत. त्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यनंतरचा जाहीर कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात त्यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी बीडच्या सध्याच्या परिस्थितीवर देखील राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. पण फडणवीस साहेब तुम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतली.. असे म्हणून ते म्हणाले की,’ जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा… ते पुढे म्हणाले की आवडली साहेब… सर्वांना आवडली. तुम्ही म्हणाले, कुणाला सोडणार नाही. यावर आमचा विश्वास आहे. अजून राख, वाळू, भूमाफीया यांनाही मोका लागला पाहिजे ही विनंती आहेत…

आपल्या भाषणात सुरेश धस पुढे म्हणाले की १९९९ ते २०२४ पाच वर्षे साहेबांचे कागद, त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. तुमच्यासोबत बसण्याची संधी मिळाली. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधर फडणवीस तरी एमएलसी होते. माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही झाला नाही. तरीही तुम्ही मला शेजारी बसण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो असेही आमदार सुरेश धस यावेळी म्हणाले.

तुम्ही बिनजोड पैलवान

साहेब, माझ्यावर हरळ उगवली असती. २०१९ पासून माझ्याविरोधात कट कारस्थान झाले. माझ्या कुटुंबियांवर कारस्थान झालं. पण तुम्ही माझ्या पाठी दत्त म्हणून उभा राहिला. जनादेश तुमच्या बाजूने होता. पहाटेच आपला जनादेश चोरून नेला. ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबीक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे यावेळी धस यांनी फडणवीस यांचे कौतूक करताना सांगितले.

धस यावेळी म्हणाले की तुम्ही विरोधी पक्षनेता असताना भाजपचे १०६, वरचे २६. त्यात मी होतो. मला निवडून आणण्यासाठी तुम्ही आणि पंकजा ताईंनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. आपले राजकीय कौशल्य आणि व्यक्तीगत जिव्हाळा होता. तुमच्या प्रेमामुळे एकही माणूस फुटला नाही. आता कुणाचे घरं पाडा, काय करा, आमच्यावर ३०-३० गुन्हे दाखल झाले. रात्री ११.३० वाजता पोलीस पाठवायचे. एवढा त्रास आम्हाला दिला असेही धस यांनी यावेळी सांगितले.

मेरे पास देवेंद्र फडणवीस है

मी दिवार सिनेमा पाहिला होता. दिवार. कॉलेजमध्ये असताना. त्यात अमिताभ आणि शशी कपूर भाऊ भाऊ असतात. निरुपा राय त्यांची आई असते. शशी कपूर इन्सपेक्टर असतो. अमिताभ झंटाफंटा दाखवला. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरेपास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तुम्हारे पास क्या है… त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय. तुमच्यासारखा नशिबवान कोणी नाही. माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का. मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं. साहेब, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काही तरी मिळेल. मला मंत्रीपद नाही दिलं तरी, मी म्हणतो मला मंत्रीपद नको, पालकमंत्रीपद नको. काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडे तीन टीएमसी पाणी द्या असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिणवतात. काय आहे याचं मुख्यमंत्र्यापाशी. मला विचारता…तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेवा अशी मागणी धस यांनी यावेळी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.