AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाता-तोंडाशी आलेला घास गेला, निसर्ग कोपला; राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतकरी चिंतेत

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास गेला, निसर्ग कोपला; राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतकरी चिंतेत
| Updated on: Dec 06, 2024 | 5:13 PM
Share

Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लागवड केलेली किंवा काढणीला आलेली अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र आता तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अलर्ट कमी झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पुन्हा कोरडे वातावरण तयार झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला आहे. तरसेच जालना ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे दृश्य मानता कमी झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

तुरीसह कांद्याचे नुकसान

जालना जिल्ह्यात रिमझिम पाऊस देखील हजेरी लावत आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे तूर, हरभरा, फळबागांसह आणि इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. काही ठिकाणी अचानक पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे तुरीसह कांदा रोपे व अन्य पिकांचे नुकसान होणार आहे.

त्यासोबतच नाशिकमध्ये ढगाळ वातावरण अवकाळी पावसानं द्राक्षं आणि कांदा उत्पादक संकटात आला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय काही ठिकाणी बे मोसमी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे कांद्याची रोपं खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच द्राक्षांच्या बागांवरही याचा परिणाम होत आहे. सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कांदा पिकांवर मावा ,तुडतुडे , पिवळेपणा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर द्राक्ष बागांवर देखील बुरी रोग वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पिकांवर कीड पडण्याची शक्यता

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात देखील जाणवू लागला आहे. धुळ्यात या चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण पसरले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांवर कीड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.