AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलेली नाही : जितेंद्र आव्हाड

माझी सुरक्षा वाढवा अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत केली नाही, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

मी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलेली नाही  : जितेंद्र आव्हाड
| Updated on: Feb 06, 2020 | 4:06 PM
Share

मुंबई : माझी सुरक्षा वाढवा अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत केली नाही, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Ministers security) यांनी जीवाला धोका असून सुरक्षा वाढवण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं वृत्त सर्वत्र प्रसारित झालं. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं. (Ministers security)

“माझी सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात यावी किंवा माझ्या जीवाला धोका आहे असं मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललेलो नाही. ही बातमी सत्यतेला धरुन नाही आणि अतिरंजीत आहे. कृपया महाराष्ट्राच्या जनतेला चुकीची माहिती मिळू नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Ministers security) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितल्याचं वृत सर्वत्र प्रसारित झालं होतं. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केल्याचं या वृत्तात नमूद होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

आव्हाडांच्या सुरक्षेत घट

गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये फडणवीस सरकारने जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. निवडणुकीच्या कारणामुळे आधी सुरक्षा काढली होती. ठाणे पोलीस दलाकडून आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी 2018 मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.