AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : संविधान बदलण्याची चर्चा, प्रचारावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट, स्पष्ट उत्तर

Devendra Fadnavis : विरोधी पक्षांकडून, पुन्हा तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल, असा प्रचार सुरु आहे. त्याविषयी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट, स्पष्ट उत्तर दिलं.

Devendra Fadnavis : संविधान बदलण्याची चर्चा, प्रचारावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट, स्पष्ट उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2024 | 11:40 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. भाजपाकडून याला संकल्प पत्र म्हटलं जात. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. “भाजपाचा जाहीरनामा ही मोदींची गॅरेंटी आहे. भाजपाचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित आहे” असं फडणवीस म्हणाले. सरकारी नोकऱ्या किती देणार? हा मुद्दा जाहीरनाम्यात आलेला नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेवढ्या जागा रिकाम्या आहेत, त्या सगळ्या भरण्याचा निर्धार आहे’ असं उत्तर दिलं. “काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता. पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आता कर्नाटकात निवडून आले, तरी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही.

काँग्रेससासठी जाहीरनामा एक कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरेंटी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच सोडून द्यावं, ते कर्नाटकातून येतात. काँग्रेस अध्यक्ष आहेत. कर्नाटकात तुम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करु शकला नाहीत. आश्वासन पूर्ण करण्यासाठी नसतात, असं तुमची लोक म्हणतात” अशा शब्दात फडणवीसांनी खरगेंवर निशाणा साधला. संविधान बदलण्याच्या मुद्दावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचार केला नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संविधानाबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलय?

“सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलय की, संविधानाच बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही. ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.