AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा

चालकाचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर तो आणी अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह अपहरण झालेला मुलगा आढळून आला.

जालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा
विद्यार्थीImage Credit source: tv9
| Updated on: May 18, 2022 | 11:37 PM
Share

जालना : राज्यात अनेक जिल्ह्यात या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तर अनेक जिल्ह्यातील पोलिस त्या सोडवत आहे. तर अनेक जिल्ह्यातील पोलिसांनाच गुन्हेगार आता आव्हान निर्माण करत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात सतत चकमक होत आहे. या घटना प्रामुख्याने मुंबई-पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरात अशा घटना होताना दिसत असतात. मात्र आता अशा घटना जालन्यासारख्या (jalana)जिल्ह्यात ही होताना दिसत आहेत. येथे एका व्यावसायिक महावीर गादिया यांच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याने तसेच त्याच्या सुटकेसाठी चार कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी अख्खा शहरात पसरल्याने या अपहरणाच्या (kidnapping) घटनेमुळं शहरच हदरलं. तसेच अख्या शहरातच भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र जालना पोलिसांनी (Jalna police) या घटनेकडे गांभीर्याने बहत पावले उचलली आणि अवघ्या पाच तासात मुलाला शोध घेतला. तसेच एकाच्या मुस्क्या आवळल्या असून इतर अपहरण कर्त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून द्या

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालना शहरात भरदिवसा एका व्यावसायिक महावीर गादिया यांचा मुलगा स्वयम् (16 वर्ष) हा दहावीत शिकतो. तो पेपर देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्यानंतर घरी रात्री बारापर्यंत ही तो परत आला नाही. त्यावर व्यावसायिक गादिया यांनी ड्राइव्हरच्या मोबाईलवर call केला. त्यावेळी एका अज्ञात अपहरणकर्त्यांनी मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून द्या अशी मागणी केली.

पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं

दरम्यान मुलगा घरी न परतल्याने व्यावसायिक गादिया यांनी पोलिसांनी याची माहिती दिली होती. आणि हा फोन झाल्याने आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळाले. त्याचवेळी त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. आणि मग तपासाची चक्रे जलद गतीने हालली. यावेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली. त्यावेळी त्यांना चालकाचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर तो आणी अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह अपहरण झालेला मुलगा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस इतर अपहरणकर्त्याचा या प्रकरणात शोध घेत आहेत.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.