AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुणराजा बरसला, मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले

वर्षभर मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला (Mumbai Tansa lake Overflow) आहे.

वरुणराजा बरसला, मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले
| Updated on: Aug 20, 2020 | 10:34 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला आहे. आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हर फ्लो झाला. (Mumbai Tansa lake Overflow)

यंदा जून, जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने निराशा केली होती. त्यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली होती. सुदैवाने ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. त्यामुळे मुंबईतील सात तलावांपैकी चार तलाव भरले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मोडक सागर धरण भरले आहे. याआधी तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यापाठोपाठ आता तानसा तलावही भरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच टळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्यावर्षी हा तलाव 25 जुलैला ओव्हरफ्लो झाला होता. तर त्याआधी 2018 मध्‍ये 17 जुलैला 2017 मध्ये 18 जुलैला ओव्हर फ्लो झाला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लीटर इतकी आहे. तो क्षमतेच्‍या 87.20 टक्‍के एवढा आहे. (Mumbai Tansa lake Overflow)

संबंधित बातम्या : 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.