AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

उन्हाळा वाढतो आहे (Rising temperature), एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. आजून मे महिना बाकी आहे. मात्र एप्रिल महिन्यातच वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसीच्या (AC demand) मागणीमध्ये अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे.

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ
| Updated on: Apr 16, 2022 | 12:18 PM
Share

उन्हाळा वाढतो आहे (Rising temperature), एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. आजून मे महिना बाकी आहे. मात्र एप्रिल महिन्यातच वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसीच्या (AC demand) मागणीमध्ये अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेष: वाढत्या उन्हाचा मोठा फटका हा पश्चिम भारताला बसत आहे. वाढत्या तापमानापासून वाचण्यासाठी नागरिक एसीची खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एसीची रेकॉर्ड तोड विक्री झाली आहे. एप्रिल (April) महिन्याच्या शेवटी एसीच्या विक्रीचा आकडा 15 लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. एसीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या पॅनासोनिक, व्होल्टास, एलजी आणि लॉयड सारख्या कंपन्यांना चालू वर्षात मोठ्या प्रमाणात एसीची विक्री होईल असा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात सर्व उद्योगधंदे ठप्प होते. मात्र यंदा एसीच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

95 लाख एसी विक्रीची अपेक्षा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पॅनासोनिक कंपनीचे दक्षिण अशियाचे प्रमुख मनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, कोरोना पूर्व काळात 2019 मध्ये एका वर्षात एकूण 75 लाख एसींची विक्री झाली होती. मात्र गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट होते. कोरोना काळात लावण्यात आलेला लॉकडाऊनचा मोठा फटका हा कंपन्यांना बसला. गेले दोन वर्ष एसची मागणी अतिशय अल्प होती. मात्र आता कोरोना संकट देखील संपले आहे आणि गरमी वाढत असल्याने एसीची मागणी वाढली आहे. या वर्षभरात 92 लाख ते 95 लाख एसीची विक्री होईल असा आमचा अंदाज आहे.

‘या’ राज्यात एसीला मागणी

सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, सुर्य आग ओकतोय. गरमी वाढल्याने देशातील प्रत्येक राज्यातून एसी, कूलर, फॅन यासारख्या थंडावा निर्माण करणाऱ्या उपकरणांना मागणी आहे. मात्र त्यामध्ये देखील उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत बोलताना हॅवल्सचे अध्यक्ष रविंद्र जुत्सी यांनी बोलताना सांगितले की, यंदा एसीला मोठी मागणी असून, चालू वर्षात आतापर्यंत कंपनीने एकूण 2.5 लाख यूनिट एसीची विक्री केली आहे.

संबंधित बातम्या

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

केंद्र सरकारचा मसुदा : गृहनिर्माण क्षेत्रात दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे अनिवार्य

Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.