मुंबई: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली आणि लोकसंगीत एकत्रित गायनाचा नवा प्रकार लोकसंगीतात रुढ केला. बरं दादा एवढंच करून थांबले नाहीत, तर देशातील पहिलं कोळीगीत सुद्धा त्यांनी गायलं. ते कोळीगीतांचे जनक आहेत. दादांनी कोळीगीत गायल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळीगीतं गायली जाऊ लागली. विशेष म्हणजे त्यांनी गायलेल्या पहिल्या कोळीगीताची रॉयल्टीही त्यांना मृत्यूपर्यंत मिळत होती. त्या गीताचा दादांनीच सांगितलेला हा किस्सा… (vitthal umap sings first koligeet in maharashtra)