AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या

Navi mumbai international airport कधीपर्यंत सुरु होणार? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे काय फायदा होणार? सध्या मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता काय आहे? जाणून घ्या.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या
Airport (Representative photo)
| Updated on: Jun 11, 2023 | 9:13 AM
Share

नवी मुंबई : मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्रासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा गेम चेंजर ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळाच पहिलं टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मूळ योजनेपक्षा दुप्पट प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.

सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा सर्व भार मुंबई विमानतळावर आहे. जागेची कमतरता ही मुंबई विमानतळाची सर्वात मोठी समस्या आहे.

मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता काय?

मुंबई विमानतळावरुन दरवर्षाला 4.8 कोटी प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधलं जाणार आहे.

जागतिक स्टॅण्डर्डनुसार विमानतळावर पोहोचायला किती वेळ लागला पाहिजे?

जागतिक स्टॅण्डर्डनुसार, शहरातील कुठल्याही प्रवाशाला डोमॅस्टिक विमानतळावर 45 ते 90 मिनिटात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी टर्मिनलला 60 ते 120 मिनिटात पोहोचता आलं पाहिजे. मुंबई जवळच्या शहरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्ही किती मिनिटात पोहोचू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.

पुण्यावरुन किती वेळ लागणार?

पुण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 2 तास लागणार.

ठाण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 45 मिनिट लागणार.

मुंबईवरुन पोहोचण्यासाठी 1 तास लागणार.

अलिबागवरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी दीडतास लागेल. मुंबई महानगर क्षेत्रात किती गावं आणि किती महापालिका?

मुंबई महानगर क्षेत्र 6,640 Sq Km मध्ये पसरलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या नऊ महापालिका या क्षेत्रात येतात. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जतस खोपोली, पेण, उरण, आणि अलिबाग या नऊ नगरपालिका यामध्ये मोडतात. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 1000 गाव या मुंबई महानर क्षेत्रात येतात.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.