AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी केंद्राची नोटीस, नंतर निवृत्ती, त्यानंतर थेट CMच्या मुख्य सल्लागारपदी; एका IAS अधिकाऱ्यासाठी ममतादीदींची केंद्रावर कुरघोडी

कोलकात्यातील मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

आधी केंद्राची नोटीस, नंतर निवृत्ती, त्यानंतर थेट CMच्या मुख्य सल्लागारपदी; एका IAS अधिकाऱ्यासाठी ममतादीदींची केंद्रावर कुरघोडी
Alapan Bandhapodhyay
| Updated on: May 31, 2021 | 8:40 PM
Share

कोलकाता: कोलकात्यातील मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे. केंद्र सरकारने बंद्योपाध्याय यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावून घेतलं. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना दिल्लीत पाठवण्यास नकार दिला. बंद्योपाध्याय यांनीही दिल्लीत जाणं टाळलं. त्यामुळे त्यांना केंद्राने कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली. पण त्याआधीच बंद्योपाध्याय यांनी रिटारयमेंट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आणखी एक डाव टाकत बंद्योपाध्याय यांना थेट त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यामुळे मुख्य सचिवांना आपल्याकडे खेचण्याच्या या नाट्यावर अखेर पडदा पडला. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून अलापन बंद्योपाध्याय यांची सेवा कधीच संपली होती. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांना तीन महिन्याची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे केंद्राने त्याला मंजुरीही दिली. मात्र कलाईकुंडामधील पंतप्रधानांच्या बैठकीतील वादानंतर बंद्योपाध्याय यांची दिल्लीत बदली करण्यात आली होती. त्यांना आज सकाळी 10 वाजता दिल्लीत रुजू व्हायचे होते. मात्र, बंद्योपाध्याय गेले नाही. आपल्याशी सल्लामसलत न करता केंद्राने हा निर्णय घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी बंद्योपाध्याय यांना सोडण्यास नकार दिला. तसेच या प्रतिनियुक्तीवर पुनर्विचार करण्याचं आवाहन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केलं होतं.

कारणे दाखवा नोटीस

बंद्योपाध्याय आज सकाळी 10 वाजता दिल्लीत ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यामुळे केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याविरोधात लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच बंद्योपाध्याय यांनी निवृत्ती घेतली आहे.

मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त

बंद्योपाध्याय यांनी निवृत्ती घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना तात्काळ त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. विद्यमान गृहसचिव एचके द्विवेदी यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, बीपी गोपालिका यांच्याकडे गृह सचिव विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत.अलापान बंद्योपाध्याय यांची ही नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यांना महिन्याला अडीच लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

संबंधित बातम्या:

एक IAS अधिकारी, ज्यावर ममता-मोदींची टक्कर जारी, मुख्य सचिव वादाच्या भोवऱ्यात

ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

(West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली