AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Tawde : ‘मोदी भक्तांनी मतदान केलं नाही, म्हणून…’, विनोद तावडे काय म्हणाले?

Vinod Tawde : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील प्रचार, अनुभव त्यांनी शेअर केला. लोकसभेला भाजपाची गाडी 400 पार का जाऊ शकली नाही? विधानसभेला भाजपा किती जागा जिंकेल? त्या बद्दल विनोद तावडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

Vinod Tawde : 'मोदी भक्तांनी मतदान केलं नाही, म्हणून...', विनोद तावडे काय म्हणाले?
Vinod Tawde
| Updated on: Nov 14, 2024 | 2:03 PM
Share

“हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात 10 वर्ष काम केलं होतं. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “ज्या पद्धतीने महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिट केलं. रस्ते, मेट्रो आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. रुग्णांना, विद्यार्थ्यांना मदत झाली. रस्ते बांधल्याचा हा परिणाम झाला. हा इनडायरेक्ट बेनिफिट आणि शून्य वीज बिल, पिक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना हा डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे” असं विनोद तावडे म्हणाले.

“हरियाणात जे घडलं ते विधानसभेला घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे. अब की बार 400 पार झालं. मोदी भक्तांनी मतदान केलं नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला” असं विनोद तावडे म्हणाले.

‘उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली’

“वंचित, सपा आणि एमआयएम स्ट्राँग आहेत. त्यांची पाच-दहा हजार मते घेण्याची क्षमता आहे. उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली हे लोकसभेत दिसली. पण अशी मते तिकडे गेल्यावर हिंदुत्वाची मते आमच्याकडे येतात. गेल्यावेळी जो मतदार बाहेर नव्हता पडला. तो वोट जिहाद पाहत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आपण एकजुटीने उतरलं पाहिजे. हे त्याला वाटत आहे. म्हणून म्हणतो बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ आहे. मोदीही तसं म्हणाले आहेत. आपण एकजूट राहिलो तर आपण सेफ राहू. आम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवलं आहे” असं विनोद तावडे म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान