AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या खासदाराचीही निवडणुकीतून माघार?

मुंबई : 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले. त्यातील एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे म्हणजे राजीव सातव. दोघांनी महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणूक शाबूत ठेवण्याचं काम केलं. मात्र, आगामी निवडणुकीत दोन्ही विद्यमान खासदार माघार घेण्याची दाट शक्यता आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघावर अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत अशोक चव्हाण […]

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या खासदाराचीही निवडणुकीतून माघार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले. त्यातील एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे म्हणजे राजीव सातव. दोघांनी महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणूक शाबूत ठेवण्याचं काम केलं. मात्र, आगामी निवडणुकीत दोन्ही विद्यमान खासदार माघार घेण्याची दाट शक्यता आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघावर अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत अशोक चव्हाण हे सर्व निवडणुका जिंकत आलेत. मात्र, मोदी लाटेत जिंकण्याचा पराक्रम केलेल्या अशोक चव्हाणांनी यावेळी मोदी लाट नसतानाही माघार घेतल्याची चर्चा आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने राज्यभर प्रचाराला फिरावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात फार लक्ष देता येणार नाही.

काँग्रेसने महाराष्ट्रात दुसरी जागा जिंकली होती, ती म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची. काँग्रेसचे युवानेते राजीव सातव हे मोदी लाटेतही हिंगोलीतून जिंकले होते. मात्र, यावेळी राजीव सातवही निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा आहे.

राजीव सातव हे सध्या काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार राजीनामे देऊन, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गुजरातमधील लोकसभेच्या जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्येच काम करण्याची खासदार राजीव सातव यांची इच्छा आहे.

मात्र, हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचे, याचा निर्णय खासदार राजीव सातव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यवर सोपवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच राजीव सातव यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतील.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...