AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन होणार की नाही? केन विल्यमसनने फायनलपूर्वी वर्तवलं भाकीत

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीपर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास जबरदस्त राहिला आहे. एकही सामना भारताने गमावलेला नाही. आता अंतिम फेरीचा सामना जिंकणार की नाही? याबाबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भाकीत वर्तवलं आहे.

World Cup 2023 : टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन होणार की नाही? केन विल्यमसनने फायनलपूर्वी वर्तवलं भाकीत
World Cup 2023 : टीम इंडिया अंतिम सामना जिंकणार की नाही? केन विल्यमसनने सांगितलं काय होईल ते
| Updated on: Nov 16, 2023 | 3:00 PM
Share

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. टीम इंडियाने 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा बदला घेतला, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. साखळी फेरी आणि उपांत्य फेरीतील कामगिरी पाहता क्रीडाप्रेमींना जेतेपदाबाबत विश्वास आहे. उपांत्य फेरीत विराट कोहलीने शतकांचं अर्धशतक आणि मोहम्मद शमीने 7 गडी बाद करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.टीम इंडियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने जेतेपदाबाबत भाकीत वर्तवलं आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाला रोखणं खूपच कठीण आहे. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 397 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावा करून सर्वबाद झाला. आता टीम इंडियाकडे तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे.

काय म्हणाला केन विल्यमसन?

केन विल्यमसनने सांगितलं की, ‘अंतिम सामन्यापूर्वी मी फक्त इतकंच सांगू शकतो की, ती वर्ल्डमधील बेस्ट टीम आहे. या संघाचे सर्व खेळाडू बेस्ट खेळत आहेत. अशा स्थितीत त्यांना अंतिम फेरीत पराभूत करणं कठीण आहे. ज्या पद्धतीने पूर्ण विश्वचषकात खेळले ते अविश्वसनीय आहे. यजमान टीम विजयाकडे कूच करत आहे. ते पूर्ण आत्मविश्वासाने जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. ते सलग सामन्यात विजय मिळवत आहेत. रॉबिन राउंडमध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्न असतो. तर बाद फेरीत तसंच खेळण्याची आवश्यकता असते.’

‘टीम इंडियाची आता तशीच मानसिकता आहे. ते त्याच पद्धतीने सामोरे जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला त्यांना रोखणं खूपच कठीण आहे.’ असंही केन विल्यमसन याने पुढे सांगितलं आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...