AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Insurance Claim : पुरामुळे कारचे मोठे नुकसान, कार इन्शुरन्स येईल का कामी

Car Insurance Claim : देशातील उत्तर भारतच नाही तर महाराष्ट्रातील कोकण पट्टीत पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचे संकट येऊन ठेपले आहे. पुराच्या पाण्यात अनेक कारचे नुकसान झाले. अशावेळी विमा कंपन्या भरपाई करतात का?

Car Insurance Claim : पुरामुळे कारचे मोठे नुकसान, कार इन्शुरन्स येईल का कामी
| Updated on: Jul 19, 2023 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुराने अनेक पर्यटनस्थळांवर अधिक्रमण केले आहे. रहिवाशी भागात पाणी शिरले. घरात पाणी शिरले. रस्ते, अंगणातील कार, बाईक या पुराच्या पाण्यात बुडालेल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने तळ ठोकला आहे. या भागात ही जोरदार पाऊस पडत आहे. अशावेळी पुरात अडकलेल्या वाहनांसाठी विम्याची (Flood Damage Car Insurance Claim) सोय असते का? असा विमा घेतला तर नुकसान भरपाई मिळते का? या विम्यासाठी कंपन्या काही वेगळे शुल्क आकारतात का? सामान्य कार विम्यात पुराच्या पाण्याची नुकसान भरपाई मिळते का ?

सामान्य कार इन्शुरन्समध्ये आहे का सोय?

स्टँडर्ड कार इन्शुरन्समध्ये (Standard Car Insurance) नैसर्गिक आपत्तीतून (Natural Disasters) होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासंबंधीचे संरक्षण या पॉलिसीत नसते. पुराच्या पाण्यात कार अडकली तर तिच्या नुकसानीची भरपाई या सर्वसामान्य इन्शुरन्समध्ये मिळत नाही.

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय

स्टँडर्ड पॉलिसी (Standard Policy), मध्ये “थर्ड पार्टी इन्शुरन्स” (Third Part Insurance) वा “लायबिलिटी इंन्शुरन्स” (Liability Insurance) चा समावेश असतो. अपघात झाला आणि त्यात तुमची चूक असेल तर समोरील व्यक्तीला नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे पुराच्या धोक्यापासून हा विमा नुकसान भरपाई देत नाही.

कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स (Comprehensive Insurance Policy)

कंप्रीहेंसिव्ह कार इंन्शुरन्स (Comprehensive Car Insurance) एक पर्यायी संरक्षण आहे. यामध्ये वाहनाची चोरी, तोडफोड, आग, पूर, वादळ, गारीचा मारा अशा नैसर्गिक संकटात कारचे नुकसान झाले तर संरक्षण मिळते. पुराच्या पाण्यात कार अडकली, डुबली तर कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स कव्हेरजमुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळते.

विम्याचा फायदा काय

नैसर्गिक आपत्तीत संरक्षण

कंप्रीहेंसिव्ह विम्यामुळे पुराच्या पाण्यासह नैसर्गिक आपत्तीत कारचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. कार पुरात अडकली. पाण्यामुळे खराब झाली तर रिपेअरिंग, दुरुस्तीसाठीची रक्कम विमा कंपन्या देतात.

चोरी झाल्यास भरपाई

कंप्रीहेंसिव्ह विम्यात नैसर्गिक आपत्तीत संरक्षण तर मिळतेच. पण कार चोरीमध्ये पण या विम्याची मोठी मदत मिळते. चोरी झालेली कार परत न मिळाल्यास तिच्या सध्याच्या बाजारातील मूल्याआधारीत रक्कम परत मिळते.

वाहनाचे नुकसान झाल्यास

नैसर्गिक आपत्तीसह वाहनावर एखादे झाड पडल्यास, भूकंपामुळे नुकसान, जंगलातील अगामुळे नुकसान झाले तर या विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.

ग्लास कव्हरेज

कंप्रीहेंसिव्ह विम्यात गाडीच्या काचेच्या संरक्षणाची हमी देण्यात येते. जर आपत्तीत तुमच्या कारचे वींडशिल्ड अथवा खिडक्यांचे नुकसान झाले तर दुरुस्तीचा खर्च मिळतो.

मनाला दिलासा

कंप्रीहेंसिव्ह इन्शुरन्स असल्याने मनाला मोठा दिलासा मिळतो. कारण अनेक गोष्टीचे नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळते. त्यामुळे विमाधारकाला नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळतो.

कायदेशीर गरज

थर्ड पार्टी इन्शुरन्स सारखा कंप्रीहेंसिव्ह विमा आवश्यक नाही. हा विमा पर्यायी आहे. कार कंपन्या साधारणपणे वाहनधारकांना कंप्रीहेंसिव्ह विमा घेण्यासाठी आग्रह करतात.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.