AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप श्रीमंत आहेत का? जेव्हा रेखा यांच्या पतीला पाहून हेमा मालिनी यांनी विचारला होता प्रश्न

अभिनेत्री रेखा या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांनी 1990 मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवालशी लग्न केलं होतं. लग्नानंतर जेव्हा हेमा मालिनी या रेखा यांच्या भेटीला गेल्या, तेव्हा त्यांनी अजबच प्रश्न विचारला होता.

खूप श्रीमंत आहेत का? जेव्हा रेखा यांच्या पतीला पाहून हेमा मालिनी यांनी विचारला होता प्रश्न
रेखा, मुकेश अग्रवाल, हेमा मालिनीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2024 | 12:52 PM
Share

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी एकापेक्षा एक दमदार चित्रपटांत भूमिका साकारल्या आबेत. आज त्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. रेखा यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी झाली, किंबहुना आजही होते. रेखा आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचा हा किस्सा फार क्वचित लोकांना माहीत असेल. हेमा मालिनी यांनी रेखा यांच्या पतीची भेट घेतल्यानंतर त्यांना चकीत करणारा प्रश्न विचारला होता. ही घटना 1990 ची आहे. रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनेत्री आणि रेखा यांच्या खास मैत्रीण हेमा मालिनी या त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. हेमा मालिनी यांची जेव्हा रेखा यांच्या पतीशी भेट झाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया चकीत करणारी होती.

जेव्हा हेमा मालिनी यांनी मुकेश अग्रवाल यांना पाहिलं, तेव्हा त्या हळूच रेखा यांच्याकडे येऊन म्हणाल्या, “आता मला तू हेसांगू नकोस की तू या व्यक्तीशी लग्न केलं आहेस.” त्यावर रेखा उत्तर देत म्हणाल्या, “हे खरंय, आम्ही लग्न केलंय.” रेखा यांचं उत्तर ऐकून हेमा मालिनी थक्क होऊन विचारतात, “ते खूप श्रीमंत आहेत का?” यावर रेखा त्यांना काहीच उत्तर देत नाही. या घटनेचा उल्लेख यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. हा किस्सा वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

दिल्लीचे व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखा यांनी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 महिन्यातच मुकेश यांनी आत्महत्या केली. लग्नाच्या काही महिन्यांतच रेखा यांना समजलं होतं की त्यांचे पती नैराश्याचे शिकार झाले आहेत. तर दुसरीकडे मुकेश रेखा यांच्यावर फिल्म इंडस्ट्री सोडण्यासाठी दबाव आणत होते. या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत नव्हते. त्यांच्यात वादविवाद होऊ लागले होते. एकेदिवशी रेखा एका स्टेज शोमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेली होती. त्यादरम्यान त्यांच्या नकळतच मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय