AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात आर्थिक विषमता वाढली; केवळ 10 टक्के लोकांकडे 57 टक्के संपत्ती

भारतामध्ये आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली आहे. आर्थिक असमानतेबाबत नुकताच पॅरिस स्थित वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅबकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशात आर्थिक विषमता वाढली; केवळ 10 टक्के लोकांकडे 57 टक्के संपत्ती
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 9:53 PM
Share

नवी दिल्ली : भारतामध्ये आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली आहे. आर्थिक असमानतेबाबत नुकताच पॅरिस स्थित वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅबकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार सर्वाधिक आर्थिक विषमता असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील दहा टक्के श्रीमंत लोकांनी सरासरी 11,65,520 रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे देशातील 50 टक्के लोकांची सरासरी कमाई ही केवळ 53,610 इतकी होती.

अहवालामध्ये काय म्हटले आहे?

या अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, भारतामधील टॉप एक टक्का श्रीमंताचा देशाच्या एकूण उत्पान्नमध्ये 22 टक्के वाटा आहे. जर देशातील दहा टक्के श्रीमंत यामध्ये समाविष्ट केल्यास हा आकडा 57 टक्क्यांवर जातो. याचा अर्थ असा की, देशातील एकूण उत्पन्नापैकी 57 टक्के उत्पन्न हे दहा टक्के लोकांकडे आहे. तर उर्वरीत 43 टक्के उत्पन्न हे 90 टक्के लोकांकडे आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बीपीएल रेषेखाली असेल्या लोकांच्या संख्येमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या एक वर्षामध्ये दिवसाला 150 रुपयांपेक्षा कमी कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.

असमानता का वाढली?

असमानता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे धन संचयन आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांकडे आहे. तर 90 टक्के लोकांकडे केवळ 30 टक्के संपत्ती आहे. परिणामी बऱ्याच जणांना कामाच्या संधी नाकारल्या जातात. काम मिळाले तर ते देखील अल्प मोबदल्यात करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार गमावले. ज्यांचे हातावर पोट होते त्यांना मोठा फटका बसला. मात्र जे श्रीमंत होते त्यांना कोरोनाचा म्हणावा एवढा फटका बसल्याचे दिसून येत नाही. कोरोना काळात अनेकांनी रोजगार गमावल्याने देखील गेल्या दोन वर्षांमध्ये ही आर्थिक विषमता आणखीनच वाढीला लागल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

सोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी; सात वर्षांमध्ये निर्यात साठ टक्क्यांनी वाढली

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.