
अलीगढमधील सासू-जावयाची केस तुम्हाला माहितच असेल. इथे मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सासू पळून गेली होती. आता ही केस जुनी झालीय. अलीगढमध्ये असचं एक मिळतं-जुळतं प्रकरण समोर आलय. अलीगढमधील पाली मुकीमपुर येथील बीसनपुर गावातील एक महिला तिच्या भाच्यासोबत पळून गेली. या महिलेला तीन मुलं आहेत. पुढच्या महिन्यात घरात मुलाचं लग्न होतं आणि आई लग्नासाठी ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन प्रियकर भाच्यासह फरार झाली.
आमच्या मुलाचं लग्न 6 मार्च 2026 रोजी होणार आहे असं पीडित पतीने सांगितलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची तयारी जोरात चाललेली. 25 जानेवारीला पत्नी माहेरी जायचय सांगून घरातून बाहेर पडली ती परतलीच नाही. नंतर समजलं की, ती 16 वर्षांनी लहान असलेला भाचा विक्रमसोबत फरार झालीय. विक्रमने माझ्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं व लुटीच्या इराद्याने तिला आपल्यासोबत घेऊन गेला असा महिलेच्या पतीचा आरोप आहे.
मुलाच्या लग्नाचं काय होणार?
महिलेने घरातून पळताना घरात ठेवलेले एक लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाली. यात मंगळसूत्र, सोन्याची चैन, अंगठी आणि पैजण याचा समावेश आहे. हे सर्व दागिने पै न पै जमवून मुलाच्या लग्नासाठी जमा केले होते. आता पती समोर संकट हे आहे की, पैसे आणि दागिने नसल्यामुळे मुलाचं लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे.
साहेब बायकोला शोधून काढा, नाहीतर..
पतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भाचा विक्रम व 9 जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. घटनेला एक महिना उलटला तरी पोलीस अजून विक्रम आणि महिलेला शोधू शकलेले नाहीत. पीडित पतीने अलीगढचे एसएसपी नीरज जादोन यांची भेट घेतली व न्यायाची मागणी केली. पतीने रडत, रडत एसएसपीना सांगितलं की, साहेब बायकोला शोधून काढा नाहीतर मुलाचं लग्न होणार नाही. संपूर्ण कुटुंब समाजात थट्टेचा विषय ठरलय.
आरोपी भाचा आणि मामीच्या वयात किती अंतर
आरोपी भाचा विक्रम त्याच्या मामीपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मामीच्या निम्म्या वयाचा आहे. पोलीस या प्रकरणाकडे प्रेम आणि कारस्थान या अँगलने पाहत आहेत. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संभाव्य ठिकाणी छापेमारी करत आहेत. पण अजूनपर्यंत काही पुरावा मिळालेला नाही.