Maharashtra News LIVE : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि दादाच्या राष्ट्रवादीची एकत्र बैठक
Maharashtra News LIVE : श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएसच्या पथकाची चौकशी संपली. चारही युवकांना चौकशीनंतर सोडण्यात आले. 11 तास श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात सुरू होती चौकशी.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचीच रणधुमाळी सध्या सुरु आहे. महायुतीमध्ये काही जागांवरुन नाराजी नाट्य रंगलं आहे. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेत्यांना मनधरणी करावी लागत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार नसून मतपत्रिकेवर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मतपत्रिका मिळणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासंदर्भात काही प्रक्रिया निश्चित केली आहे त्यानुसार मतपत्रिकेत उमेदवारांची नावे असतील. पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतदाराला ‘1’ क्रमांक लिहावा लागणार आहे. निवडणुकीत जेवढे उमेदवार रिंगणात आहेत त्या प्रत्येकाला पसंतीच्या क्रमांकानुसार मत देता येणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आता कोलकातामध्ये वॉटर मेट्रो धावणार
श्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कोलकातासाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, कोलकाता जल मेट्रोने जोडले जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांनी आजच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
-
तब्बल 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून टोळीने पळ काढला
शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे अन्न आणि औषध प्रशासनाच्या धास्तीने तब्बल 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून टोळीने पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
-
-
भाजपने 11 राज्यसभा उमेदवारांची नावे केली जाहीर
भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांना मध्य प्रदेशमधून, हरियाणाचे प्रभारी सतीश पुनिया यांना राजस्थानमधून, तर दिल्लीच्या प्रभारी अलका गुर्जर यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नुकतेच भाजपमध्ये सामील झालेल्या देवाशीष सामंतराय यांना ओडिशामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि दादाच्या राष्ट्रवादीची एकत्र बैठक
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेना व दादाच्या राष्ट्रवादीची एकत्र बैठक झाली. या बैठकीला मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडीसंदर्भात महायुतीच्या नेत्याची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काल अब्दुल सत्तार यांनी भाजपाने अतुल सावे यांच्यावर केली होती, पण दोघेही बैठकीत एकत्र होते.
-
मविआच्या उमेदवारांच्या माघारीसाठी दिवसभरात 150 कोटी खर्च- राऊत
विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. माघारीसाठी दिवसभरात 150 कोटी खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रमुख उमेदवारांना 25 कोटी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. कोकण आणि संभाजीनगरच्या जागेसाठी व्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलं.
-
आमदार संग्राम जगताप दत्तात्रय पानसरे यांच्या भेटीला, कारण काय?
अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी AP आमदार संग्राम जगताप हे दत्तात्रय पानसरे यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर आता आमदार जगताप हे पानसरे यांच्या भेटीला गेले आहेत. आमदार जगताप यांची शिष्टाईला यश येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्ज माघारी वरून प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे.
-
रेशीमबागमध्ये थोड्याच वेळात RSS ‘कार्यकर्ता विकास वर्ग-2’चा समारोप कार्यक्रमाला सुरुवात
नागपूर येथील रेशीमबागमधील मैदनात थोड्याच वेळात RSS ‘कार्यकर्ता विकास वर्ग-2’चा समारोप कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे देशभरातील स्वयंसेवकांचे लक्ष लागलं आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘पंचपरिवर्तन’ उपक्रमाचा उल्लेख भाषणात होण्याची शक्यता आहे. भागवत जागतिक युद्धजन्य परिस्थिती, महागाई, युवकांशी संबंधित प्रश्न आणि सामाजिक विषयांवरही भाष्य करू शकतात.
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र जरांगे पाटील यांची तब्येत अजूनही काही प्रमाणात खालावली असल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. जरांगे पाटील यांना डॉक्टरांकडून पुढील 8 ते 10 दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रकृती ठीक झाली तर येत्या 6 तारखेला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणार असल्याचे जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे.
-
मुंबई नाशिक महामार्गावर खर्डीजवळ अपघात
शहापूरमधून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर खर्डीजवळ अपघात झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. बाईक खर्डी येथील रेल्वे पुलाच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकली. अपघातामुळे बाईकवरील दोघे पुलावरून थेट 200 फूट खाली रेल्वे ट्रॅकवर फेकले गेले. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर 1 गंभीर जखमी आहे. जखमीवर खर्डी येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दोघेही अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचं समजत आहे.
-
अहिल्यानगर : अर्ज माघारीसाठी दबाव टाकला – दत्तात्रय पानसरे
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या अर्ज माघारीवरून नवा वाद झाला आहे. आपली परवानगी किंवा सही नसताना उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचा पानसरे यांनी दावा केला आहे. अर्ज माघारीसाठी दबाव टाकण्यात आल्याचा तसेच घराला गराडा घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपल्या जीवाला धोका असून काही घातपात झाल्यास संबंधित प्रक्रियेतील लोक जबाबदार राहतील असेही पानसरे यांनी म्हटले आहे. आपल्यावर मोठा दबाव असूनही लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे पानसरे यांचे स्पष्ट केले आहे.
-
11 जागी देखील महायुती निवडून येणार – गिरीश महाजन यांचा आत्मविश्वास
राज्यात सहा जागा या बिनविरोध झालेल्या आहेत. 17 पैकी 11 जागांवर निवडणूक होत असून त्या 11 जागा देखील महायुतीच्याच निवडून येतील. एकही जागा ही महाविकास आघाडीला मिळणार नाही. या विधान परिषदेला महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून येणार नाही असे भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. बंडखोरी झाली असेल तरी महायुती भक्कम आहे. आणि महायुती म्हणूनच आम्ही सर्व ठिकाणी एकमताने लढणार आहोत असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
-
पिंपरी- चिंचवड : पाच तास उलटले, तरी विषारी दारुअड्ड्यावरील कारवाई सुरूच
विषारी दारुकांडाचा अड्डा असलेला पिंपरी- चिंचवडमधील केंद्रबिंदू नेस्तनाबूत करण्यासाठी गेली पाच तास शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. फुगेवाडीत निमुळते रस्ते असल्याने जेसीबी आणि पोकलेन सारखी मशनरी इथे पोहचू शकत नाही. परिणामी हॅन्ड ब्रेकर आणि हतोड्याच्या साह्याने हे पाडकाम केले जात आहे. हे पाडकाम करण्याचे मोठे आव्हान असल्याने कर्नेलसिंगचे घर आणि त्या घरातील दारुअड्डा जमीनदोस्त करायला उशीर होतो आहे.
-
नगर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यावरुन मोठा गोंधळ
विधान परिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ झाला आहे. अर्ज मागे घेण्यावरून भाजपा कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार समोरासमोर आले. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकारी दालना समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्त्यांनी आम्हालाही आतमध्ये सोडा असा तगादा लावल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज सूचकाने माघारी घेतल्याने हा गोंधळ झाला आहे. मात्र आपण अर्ज मागे घेण्यास सांगितले नसल्याचे दत्तात्रय पानसरे यांची म्हटले आहे.
-
महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांची विधानपरिषद निवडणुकीतून माघार
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी अचानक माघार घेतली आहे.देवयानी डोणगावकर यांनी माघार घेण्याचं कारण वैयक्तिक सांगितलं जात असलं तरी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
-
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आमने-सामने
सोलापूर विधान परिषद बिनविरोध नाही
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती
भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात लढत
जिल्ह्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ही निवडणूक जाणीवपूर्वक लादली
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची धैर्यशील मोहिते पाटलांवर नाव न घेता टीका
-
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील आरोपीचे घर पाडले
पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे अनेकांचा बळी गेला होता. दरम्यान त्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कर्नल विरखा यांच्या घरावर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे.
-
काँग्रेसवर मोठी नामुष्की, उमेदवाराने अर्ज घेतला मागे
भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता काँग्रेसवर मोठी नामुष्की आली आहे.
-
अहिल्यानगरला विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं ठिय्या आंदोलन
अहिल्यानगरला विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं ठिय्या आंदोलन
जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू
जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणावर उठणार नाही
जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाची परिस्थिती
-
नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकरांची निवडणुकीतून माघार
नांदेड – विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकरांची निवडणुकीतून माघार घेतली आहे. रामदास पाटील सुमठाणकर यांना काँग्रेसने ए बी फॉर्म दिला होता.
-
ळगावमधून तिन्ही राष्ट्रवादी बंडखोर उमेदवारांनी घेतली माघार
मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेत समजूत काढल्यानंतर जळगावमधून तिन्ही राष्ट्रवादी बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तिन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
-
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर वानराचा कब्जा
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर कार्यालयाच्या पोर्चमध्ये थांबवलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर मात्र वानराने कब्जा केला. मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनासोबत असणाऱ्या पोलिसांनी वानराला हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा ते पंधरा मिनिटं वानराने मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनाचा ताबा सोडला नाही. यामुळे मात्र सातारा पोलिसांची एकच तारांबळ उडाली. अखेर वानराने स्वतःहून मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनाचा ताबा सोडल्याने सातारा पोलिसांनी सुटकेचा नि: श्वास टाकला.
-
मविआत जागा घेण्यासाठी नव्हे तर जागा देण्यासाठी रस्सीखेच, तटकरे यांची टीका
महाविका आघाडीत जागा घेण्यासाठी नव्हे तर जागा देण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीत निवडणूक लढायला कोणी तयार नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी पक्षाचे खाससदार सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीवर केली.
-
माघारीच्या शेवटच्या दीड तासात जळगाव मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे
राष्ट्रवादीच्या बंडखोरांशी चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजनांकडून शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर दीपक धांडे यांची भेट घेतली. जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचे बंडखोर दीपक धांडे व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये माघारीबाबत चर्चा सुरू आहे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली मात्र आमचे शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानंतरच माघार घेण्यासंदर्भात विचार करणार असल्याची प्रतिक्रिया दीपक धांडे यांनी दिली.
-
अर्चना गंगणे यांचा उमेदवारी अर्ज मागे
तुळजापुरचे भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी अर्चना गंगणे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषद साठी अर्चना गंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख अधिकृत उमेदवार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत.
-
सय्यद फारूक सय्यद करीम यांनी घेतला अर्ज मागे
यवतमाळ विधान परिषद निवडणूकित अपक्ष उमेदवार सय्यद फारूक सय्यद करीम यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मविआची सय्यद फारूक यांच्यावर भिस्त होती. सय्यद फारूक यांना पुरस्कृत उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरू असतानाच उमेदवारी अर्ज मागे घेतला. यवतमाळ विधान परिषद निवडणूक मध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
-
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतून अपक्ष उमेदवार मच्छिंद्र धुमाळ यांची माघार
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात आहेत. तर अपक्ष उमेदवार मच्छिंद्र धुमाळ यांनी माघार घेतली आहे. भाजपचे प्राजक्त तनपुरे आणि तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात नवं वळण
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात नवं वळण मिळाले. तक्रारदारच ठरला मुख्य आरोपी ठरला. कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांडात पोलिस तपासातून धक्कादायक खुलासा समोर आला. दीपक ठाकूर, किशोर चौहान, अमन चौहानसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला. गोळीबारापूर्वी मारहाण आणि हल्ल्याचा आरोप झाल्याने पोलिस तपासात नवी दिशा मिळाली.
-
बंडखोर साजिद बेग यांची निवडणूकितून माघार
यवतमाळ विधान परिषद निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार चे बंडखोर साजिद बेग यांची निवडणूकितून माघार घेतली. महायुतीचा उमेदवार विजय सुकर व्हावा म्हणून माघार घेत असल्याचे सांगितले. वरिष्ठ नेत्यानी उमेदवारी दाखल करायला सांगितले होते आता महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता युतीच्या उमेदवार सोबत राहणार असल्याचे सांगितले
-
सुरेंद्र लोही यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
नागपूर विधान परिषद निवडणूकीत काटोल येथील शेतकरी कामगार पक्षाचे नगर सेवक सुरेंद्र लोही यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शासकीय कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्क माफ करण्याचे राज्य सरकारच्या पणन संचालनाचे परिपत्रक काढत आदेश दिला. नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीवर बाजार समित्या शुल्क आकारू शकणार नाहीत. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट; 316 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. शुल्क माफीमुळे बाजार समित्यांचे 3 कोटी 16 लाख रुपयांचे संभाव्य नुकसान झाले आहे. व्यापार्यांनीही शुल्क माफीची मागणी केली आहे. बाजार समित्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कांदा खरेदी निर्णयामुळे बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात नवं वळण, तक्रारदारच मुख्य आरोपी
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात नवं वळण आलं आहे. तक्रारदारच मुख्य आरोपी ठरला . कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांडात पोलिस तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. दीपक ठाकूर, किशोर चौहान, अमन चौहानसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोळीबारापूर्वी मारहाण आणि हल्ल्याचा आरोप. पोलिस तपासात नवी दिशा. दोन जणांच्या मृत्यूनंतरच्या तपासात घटनांची दुसरी बाजू समोर आली .
-
जळगाव विधान परिषदेत बंडखोरी, उमेदवारांच्या मनधरणीसाठी मंत्री गिरीश महाजन राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाख
जळगाव विधान परिषदेत बंडखोरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या मनधरणीसाठी मंत्री गिरीश महाजन राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील तसेच पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजन यांची बैठक सुरू आहे.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तीन उमेदवारांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महायुतीमध्ये भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नेत्यांची तसेच बंडखोरांची मनधरणी सुरू आहे.
-
पारनेर, अहिल्यानगर – कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक
पारनेर, अहिल्यानगर – कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. देसवडे येथे शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफी आदेशाची होळी केली. सरसकट कर्जमाफीची मागणी; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. ५० हजारांच्या मर्यादेमुळे बहुसंख्य शेतकरी वंचित राहणार असल्याचा आरोप करण्यात आला. नियमित कर्जदारांसाठीही दोन वर्षांची अट अन्यायकारक असल्याची टीका केली.
-
शरद पवारांच्या भेटीसाठी संजय काकडे सिल्व्हर ओकवर पोहोचले
शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय काकडे सिल्व्हर ओकवर पोहोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
-
अहिल्यानगर – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस
अहिल्यानगर – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा एकमेव पक्षीय अर्ज आहे. चार उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांचाही अपक्ष अर्ज कायम आहे. आजच्या घडामोडींवर जिल्ह्याचे लक्ष; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी
बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार. आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल, त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे देणे बाकी आहे.
18 डिसेंबर 2024 रोजी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा विष्णू चाटेच्या वकिलाचा दावा. वकील निलेश यादव यांनी युक्तिवाद केला . पुढील सुनावणीत विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची तसेच तसेच प्रलंबित अर्जांवर देखील आदेश येण्याची शक्यता आहे.
-
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष, निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सेन्सॉर बोर्डात अध्यक्ष असताना घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे ते अनेकदा चर्चेत होते. वाचा सविस्तर बातमी..
-
केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, यंदा 3 दिवस उशिराने मान्सून केरळात दाखल
केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झाला आहे. यंदा नेहमीच्या निर्धारित वेळेपेक्षा 3 दिवस उशिराने मान्सून केरळात दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात 15 जूननंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असंच तापमान कायम असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
-
ठाण्यातील विधानपरिषद निवडणूक होणार बिनविरोध
ठाण्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत पवार यांनी अर्ज मागे घेतला आहे. वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रविंद्र फाटक यांचा विजय निश्चित आहे. ठाण्यात बंडखोरी झाली नव्हती, तसंच इतर कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे आता रवींद्र फाटक बिनविरोध निवडून येणार आहेत.
-
सांगली-साताऱ्यातून शिवसेनेचे तानाजी पाटील माघार घेण्याची शक्यता
विधान परिषदेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबत नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील माघार घेणार, यावरून खलबतं सुरू आहेत. त्यामुळे दुपारी 3 नंतर कोणाची माघार होणार, याचं चित्र स्पष्ट होईल.
-
बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावाकडे रवाना
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून जळगावाकडे रवाना झाले आहेत. बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री महाजन हे जळगावाकडे निघाले आहेत. जळगावात शिवसेनेत दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अर्ज भरले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या जिल्हाप्रमुख तसंच पदाधिकाऱ्यांना सोबत घेत सहलीला रवाना झाले आहेत. त्यामुळे नाशिक सोडून मंत्री गिरीश महाजन तातडीने आता जळगावमध्ये दाखल होण्यासाठी निघाले आहेत. जळगावमध्ये अपक्षांच्या मनधरणीसाठी तसंच बंडखोरी मागे घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन निघाले आहेत.
-
नांदेडमधील माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा अर्ज मागे
नांदेडमधील माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विधान परिषद निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसकडून जवळगावकर आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी सुमठाणकर यांची उमेदवारी कायम आहे. पक्षाने आदेश दिल्याने उमेदवारी मागे घेतल्याची प्रतिक्रिया जवळगावकर यांनी यावेळी दिली.
-
समीर सत्तार थोड्याच वेळात अर्ज मागे घेणार
विधान परिषद निवडणुकीतून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार थोड्याच वेळात अर्ज मागे घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जालन्यात समीर सत्तार त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत.
-
दगीरमध्ये सलग तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस; उष्णतेपासून दिलासा, पण बळीराजाची चिंता वाढली
उदगीर: लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास अचानक येणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून शेतीकामांचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणातील उष्णता कमी होऊन परिसरात गारवा निर्माण झाला आहे. हवामानात झालेल्या या अचानक बदलामुळे शेतात काढून ठेवलेले धान्य व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बळीराजाची चांगलीच धावपळ उडाली. सलग तीन दिवस पडणाऱ्या या मान्सूनपूर्व सरींमुळे एका बाजूला उष्णतेपासून सुटका झाली असली, तरी आगामी मान्सूनच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे.
-
देवरीत मध्यरात्रीच्या सुमारास अपघात: ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक, 2 जण गंभीर जखमी
देवरी: गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातून जाणाऱ्या कलकत्ता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील राणी दुर्गावती चौकात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी थेट ट्रकच्या खाली अडकली. या अपघातात मोटारसायकलवरून प्रवास करणारे दोन युवक गंभीररित्या जखमी झाले असून ते देवरी तालुक्यातीलच रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जखमींची गंभीर अवस्था पाहता त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर आणि परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती, तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
-
बारामतीत महागाईविरोधात शरद पवार गट आक्रमक; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात आज आंदोलन
बारामतीमध्ये आज महागाई, इंधन दरवाढ आणि कांद्याच्या दरासह विविध प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमधील तीन हत्ती चौक येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असून, यात पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
-
परभणीत FDA ची मोठी कारवाई; ३ लाख ४७ हजारांचा टोस्ट, अवैध तेल साठा जप्त!
परभणी शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग अचानक ॲक्शन मोडवर आला असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल ३ लाख ४७ हजार रुपये किमतीचा टोस्ट आणि अवैध खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ‘किसान फूड्स’मधून लेबल नसलेला २८६ किलो चेरी व तीळ टोस्टचा साठा जप्त करण्यात आला, तर ‘मणियार ट्रेडर्स’वर धाड टाकून ३ लाख १९ हजार रुपयांचे विनापरवाना व खुले सोयाबीन आणि पाम तेल जप्त करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, ‘अंबा आईस्क्रीम’चे खाद्य बर्फ देखील सध्या एफडीएच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
-
आता स्थानिक निवडणुकांना अर्थ उरला नाही, ज्याच्याकडे पैसा तोच जिंकणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून अत्यंत तीव्र आणि खळबळजनक भाष्य केले आहे. आता या निवडणुकांना काहीही अर्थ उरलेला नसून, ज्याचा भाव जास्त तोच निवडून येईल,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मतं विकत घेण्यासाठी ज्याच्याकडे पैसा आहे तोच जिंकेल आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सध्या केवळ पैशांचा खेळ सुरू आहे, अशी टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की अशा परिस्थितीत कोणताही ‘संकटमोचक’ काहीही करू शकत नाही. नाशिकमधील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले की, तिथे पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नव्हता आणि नाशकात ज्याची इच्छा असेल त्याने लढावे, अशीच पक्षाची भूमिका होती.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज मकोका न्यायालयात सुनावणी, जामीन अर्जावर निर्णय होणार?
बीड: जिल्ह्यातील अत्यंत गाजलेल्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याने सादर केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाने यापूर्वीच कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले असून, त्यावर आज न्यायालय निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मागील सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉपमधील डेटाच्या क्लोन कॉपीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे आजच्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांना ही क्लोन कॉपी उपलब्ध करून दिली जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-
गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश
गणेश गीते घेणार निवडणुकीतून माघार. खात्री लायक सूत्रांची TV9 ला माहिती. गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती.. गणेश गीते स्वतः माघारीसाठी भावाची समजूत काढणार. सूत्रांची माहिती. कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा मुंबईत तळ ठोकून. मात्र महाजनांच्या मध्यस्थीने गणेश गीते माघार घेणार असल्याची माहिती. गणेश गीते माघार घेणार, मात्र गोकुळ गीते अपक्ष लढणार असल्याची सूत्रांची माहिती
-
बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीत गुन्हा दाखल…
गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये बाजोरियावर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बाजोरिया यांच्यावर आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाजोरिया पिता पुत्रांनी घातला होता गोंधळ. विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज काल बाद करण्यात आला आहे
-
धाराशिवमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; 5 महिलांची सुटका, तर व्यवस्थापक व चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल. या प्रकरणी धाराशिवच्या आनंद नगर पोलिस स्टेशन मध्ये स्पा सेंटरच्या व्यवस्थापक व चालकावर गुन्हा दाखल. धाराशिव शहरातील ओरा स्पा सेंटरवर स्पा सर्विसच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय
-
24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
उत्तर प्रदेश पासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे
-
पिंपरी चिंचवडमधील ‘तो’ दारु अड्डा पालिका नेस्तनाबूत करणार
शेजारील नागरिक कर्नल सिंग विरखाच्या घरातील साहित्य काढून घेत आहेत. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत जिथून विषारी दारुची विक्री झाली, तो कर्नल सिंग याचा दारू अड्डा महापालिका नेस्तनाबूत करणार आहे. आरोपी कर्नल सिंग विरखा हा स्वतःच्या राहत्या घरातूनच हा अवैध दारू विक्रीचा धंदा करत होता. तेच घर महापालिकेच्या पडताळणीत हा दारू अड्डा अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळं हा दारू अड्डा हटवण्याचा आदेश देण्यात आलाय.
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव प्रचंड घसरले
पेरणीच्या तोंडावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव प्रचंड घसरले. प्रति क्विंटल तुरीच्या दरात 800 ते 1000 रुपयांची घसरण. काही दिवसांपूर्वी तुरीचे दर 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल वर गेले होते. आता ऐन पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
-
जळगावातील चोपडा येथे 500 अतिक्रमणे जमीनदोस्त
जळगावातील चोपडा येथे पोलीस बंदोबस्तात 500 अतिक्रमणे जमीनदोस्त. चोपडा शहरातील मुख्य रस्त्यासह सहा ते सात ठिकाणी नगर परिषदेची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम. रस्ते झाले मोकळे, काही जणांनी काढले स्वतःहून अतिक्रमण, काही ठिकाणी किरकोळ वाद. जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 500 लहान-मोठी अतिक्रमणे व ओटे काढून शहरातील रस्ते मोकळे केले. काही ठिकाणी किरकोळ वाद झाला, मात्र तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला.
-
महिला सरपंचाच्या घरावर हल्ला
बीडच्या माजलगाव तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे महिला सरपंच उषा भगवान राठोड यांच्या घरावर रात्री दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात महिला व लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आली तर वसंत राठोड यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला.
-
विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचाअंदाज
विदर्भातील काही जिल्ह्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. उत्तर प्रदेश पासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे.
-
बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीत गुन्हा दाखल
बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीत गुन्हा दाखल. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये बाजोरियावर गुन्हा दाखल. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पिता पुत्रानी घातलेला वाद. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर घातला होता वाद. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बाजोरिया यांच्यावर आहे.
-
नाशिकमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी चांगली बातमी
गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश. गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार. खात्री लायक सूत्रांची TV9 ला माहिती.
गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती. गणेश गीते स्वतः माघारीसाठी भावाची समजूत काढणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषदेची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली आहे.