Ashish Shelar | मविआ सरकारला सामान्यांशी काही देणंघेणं नाही, आशिष शेलारांचा हल्लाबोल
भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या कामकाजावर बोलण्यासाठी शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या कामकाजावर बोलण्यासाठी शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पिता, पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार अशी खरमरीत टीका शेलार यांनी केलीय. काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. असे शेलार म्हणाले.
Latest Videos
Latest News