.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राताली गावांचा लळा, का आणि कशासाठी…

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांचा आताच का लळा लागला आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राताली गावांचा लळा, का आणि कशासाठी...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Nov 23, 2022 | 9:17 PM
Share

सांगलीः पाणी आणि रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यातील चाळीस गावांनी तत्कालीन सरकारला कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकार बदलले आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील योजनांनादेखील गती मिळाली. त्यामुळे विकासात्मक गोष्टी या तालुक्यालाही मिळाल्या. ज्या योजनांसाठी या गावांनी इशारा देण्यात आला होता ती म्हैसाळ योजनादेखील आता अंतिम टप्प्यात आली. त्यामुळे या 40 गावांपैकी एकही गाव आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या मानसिकतेत नाही.

त्यामुळे 2009 म्हणजेच 13 वर्षानंतर बसवराज बोमई यांना यांना सांगली जिल्ह्यातील या 40 गावांची आठवण का झाली आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

बेळगावचा सीमालढा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे, त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर त्यांनी दावा केला आहे.

त्यामुळे सीमाभागातील नागरिकांसह महाराष्ट्राताली नेत्यांनाही अजब वाटले आहे. त्यामुळे 13 वर्षापूर्वी जत तालुक्यातील ज्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता.

त्या 40 गावांचा लळा आता कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांना आला आहे. जत तालुक्याती 40 गावांना पाणी आणि रस्त्याची सुविधा नसल्याने त्यांनी कर्नाटक सरकारला पत्र लिहून 2012 आणि 2015 साली कर्नाटकात येणार असल्याचे कळवले होते.

त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जत तालुक्याचा दौरा करुन पाणी समस्या सोडवण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतर सरकारकडून जत तालुक्यात विकास करण्याचा प्रयत्नही झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने 11 ऑगस्ट 2021 म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले जाते.

Follow Us
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!