‘मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री काय होणार?’, भरत गोगावले यांच्याकडून नाराजी व्यक्त?

शिवसेना नेते भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. राज्य सरकारकडून आज 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

'मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री काय होणार?', भरत गोगावले यांच्याकडून नाराजी व्यक्त?
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 6:20 PM

रवी खरात, Tv9 मराठी, रायगड| 4 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु होत्या. त्यानंतर आज मोठी बातमी समोर आली. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन अजित पवार आणि भाजपमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. अखेर अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. राज्य सरकारकडून आज 11 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदावरु डच्चू देण्यात आलाय. त्यांच्याऐवजी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. चंद्रकांत दादांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने भरत गोगावले यांच्या गळ्यात अद्याप मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. भरत गोगावले यांनी अनेकवेळा मंत्रिपदाची आशा व्यक्त केलीय. पण त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही. या दरम्यान 11 जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर करण्यात आलीय. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

भरत गोगावले यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

“आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात जे काही ठरलं, त्यानंतर याबाबतची आज घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं. चांगली बाब आहे. त्याचं अभिनंदन! खरंतर पालकमंत्रीपद त्यांना दिलं नव्हतं. कदाचित ते बसून ठरवून त्यांना दिलं असेल”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिलं.

रायगड आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे तो निर्णय आहे. मागच्या वेळेला चर्चा झाल्याप्रमाणे कदाचित तो निर्णय झाला नसावा. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील”, असं भरत गोगावले म्हणाले.

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत गोगावले नेमकं काय म्हणाले?

“रायगडचं पालकमंत्रीपद सध्या मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. अडचणीची बाब नाही. उदय सामंतांकडे पहिल्यापासूनच ते पालकमंत्री पद दिलं आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे राहील, असं मला वाटतं”, अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.

पालकमंत्री पदासाठी आपली वर्णी लागू शकते का? असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रयत्न चालू आहेत. “योग्य वेळेला ते होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निर्णय घेण्याचा अधिकार सोपवला आहे. ते योग्य निर्णय घेतील, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

यावेळी भरत गोगावले यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मी मंत्री झालो नाही. त्यामुळे पालकमंत्री कसा होणार? मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री होता येईल. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रीपद राखून ठेवलेलं आहे. विचार विनिमय चालू आहेत. त्यातून योग्य ते घडेल”, असं भरत गोगावले म्हणाले.

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.