AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन भारत सरकारचा पाकिस्तानला अल्टिमेटम, ICC ला ही…

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीवर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने पाकिस्तानला एका ओळीचा अल्टिमेटम दिला आहे. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याबाबत आयसीसी आजच निर्णय घेणार आहे. त्याआधी सरकारने हा अल्टिमेटम दिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन भारत सरकारचा पाकिस्तानला अल्टिमेटम, ICC ला ही...
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 29, 2024 | 5:52 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाबाबत आज बैठक घेणार आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा पाकिस्तानात आयोजित केली जात आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला स्पष्ट सांगितले आहे की, भारतीय संघ कोणत्याही परस्थितीत पाकिस्तानला जाणार नाही. पाकिस्तान संपूर्ण आयोजन करण्यावर ठाम आहे.

आयसीसी बोर्डाची आज बैठक होणार आहे. त्यामुळे यावर आज निर्णय होऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात भारतीय संघाचे सामने दुसऱ्या देशात खेळवले जाऊ शकतील का अशी चाचपणी सुरु आहे. पण त्याआधीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका ओळीत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक निवेदन जारी केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या आहेत, त्यामुळे संघ पाकिस्तानात जाणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

आयसीसीला मात्र माहित आहे की, भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर या सीरीजची रंगत कमी होऊन जाईल. पाकिस्तानला देखील तशी समजूत घातली जात आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. या प्रकरणावर एका सूत्राने माहिती दिली की, ‘हायब्रीड’ मॉडेलचा विचार केला जाऊ शकतो. सर्वांचा विचार करून आयसीसी निर्णय घेईल. भारत आणि पाकिस्तानशिवाय स्पर्धेचे आयोजन अशक्य असल्याचं देखील बोललं जात आहे. आयसीसी आणि ब्रॉडकास्टर यांच्यातील करारानुसार, स्पर्धेचे वेळापत्रक किमान 90 दिवस अगोदर जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु तसे होऊ शकलेले नाही.

भारत आणि पाकिस्तानला वेगळ्या गटात ठेवलं जाईल का ही शक्यता ही नाकारली जात आहे. स्पर्धेची लोकप्रियता आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची मागणी होईल. जितके सामने दोघांमध्ये होतील तितकी या स्पर्धेला प्रसिद्धी मिळेल आणि आर्थिक फायदा ही होईल. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही. सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआय देखील संघाला तेथे पाठवणार नाही.

भारतात पाकिस्तानला तीव्र विरोध होतो. त्यामुळे राजकीय परिस्थिती देखील लक्षात घेतली जाते. पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक त्यांच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरले होते. ज्यामध्ये मोठा हिंसाचार देखील झाला आणि काही सुरक्षा रक्षक देखील मारले गेले. पण हिंसाचारानंतर पक्षाने आंदोलन मागे घेतले आहे.

आता अशा तणावाच्या स्थितीत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणं किती जोखमीचे आहे. पण पाकिस्तान सरकार आणि पीसीबी खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देत आहे. असं असलं तरी भारताचे सामने यूएईमध्ये होऊ शकतात. पण जर यावर पीसीबीने बहिष्कार टाकला तर आयसीसी तटस्थ ठिकाणी आयोजन करण्याचा निर्णय घेऊ शकते.

येत्या काही वर्षांत भारतात देखील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणार आहे. पाकिस्तानने जर आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकला तर त्याला भारतात होणाऱ्या पुढच्या स्पर्धांनाही मुकेल. ज्याचा मोठा फटका पीसीबी आणि संघाला बसेल. पुढे भारतात आशिया चषक (2025), महिला विश्वचषक (2025) होणार आहे. भारत श्रीलंकेसोबत संयुक्तपणे T20 विश्वचषकाचे (2026) यजमानपद देखील भूषवणार आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...