AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये

सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते.

व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 19, 2023 | 3:37 PM
Share

नवी दिल्ली : राजस्थानात पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. फळबाग लावल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. त्यांचे उत्पन्न लाखो रुपयांत होत आहे. आता आपण राजस्थानच्या अशा शेतकऱ्याविषयी पाहणार आहोत ज्याने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती केली. यातून ते दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत आहेत. या डाळिंबाला विदेशातही मागणी आहे. शेतकरी श्रवण सिंह यांच्या बागेत डाळिंबाचे पाच हजार झाडं आहेत. दुसरे पाच हजार झाडं त्यांनी त्यांच्या भावाच्या फार्महाऊसवर लावले. याशिवाय तायवाई पिंक पेरू, केसर आंब्याची जातीही शेतात लावली. सेंद्रीय पद्धतीने ते सर्व शेती करतात.

सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते. श्रवण सिंह यांनी फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आधुनिक पद्धतीने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती त्यांनी केली. यातून त्यांना वर्षाला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

१२ हेक्टरमध्ये लिंबूचे शेती

श्रवण सिंह म्हणतात, फळबागेची सुरुवात त्यांनी पपईपासून केली. यात त्यांना चांगला फायदा झाला. फळबाग लागवडीचे क्षेत्र ते वाढवत गेले. तिसऱ्या वर्षी त्यांना १८ लाख रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये लिंबूची लागवड केली. २०१३ मध्ये त्यांनी डाळिंबाचे रोप लावले. दोन वर्षांनंतर त्यांना डाळिंबाचे उत्पादन मिळाले. श्रवण सिंह यांनी डाळिंब बांग्लादेश, नेपाळ आणि दुबईला पाठवले. लॅबमध्ये टेस्ट झाल्यानंतरच फळं बाहेर देशात पाठवली जातात. रिलायन्स फ्रेश, सुपरमार्केट, इरीगेशनसारख्या मल्टिनॅशन कंपन्यांना ते फळं पुरवतात.

अंगुरावर प्रयोग सुरू

श्रवण सिंह हे आता अंगुरावर प्रयोग करत आहेत. डाळिंब, लिंबू, पेरू विकून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये उत्पन्न मिळवतात. आता त्यांनी आपला मोर्चा अंगुर लागवडीकडे वळवला आहे. यात कितपत यश येते, हे येणारी वेळच सांगेल.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....