AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये

सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते.

व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 19, 2023 | 3:37 PM
Share

नवी दिल्ली : राजस्थानात पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. फळबाग लावल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. त्यांचे उत्पन्न लाखो रुपयांत होत आहे. आता आपण राजस्थानच्या अशा शेतकऱ्याविषयी पाहणार आहोत ज्याने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती केली. यातून ते दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत आहेत. या डाळिंबाला विदेशातही मागणी आहे. शेतकरी श्रवण सिंह यांच्या बागेत डाळिंबाचे पाच हजार झाडं आहेत. दुसरे पाच हजार झाडं त्यांनी त्यांच्या भावाच्या फार्महाऊसवर लावले. याशिवाय तायवाई पिंक पेरू, केसर आंब्याची जातीही शेतात लावली. सेंद्रीय पद्धतीने ते सर्व शेती करतात.

सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते. श्रवण सिंह यांनी फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आधुनिक पद्धतीने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती त्यांनी केली. यातून त्यांना वर्षाला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

१२ हेक्टरमध्ये लिंबूचे शेती

श्रवण सिंह म्हणतात, फळबागेची सुरुवात त्यांनी पपईपासून केली. यात त्यांना चांगला फायदा झाला. फळबाग लागवडीचे क्षेत्र ते वाढवत गेले. तिसऱ्या वर्षी त्यांना १८ लाख रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये लिंबूची लागवड केली. २०१३ मध्ये त्यांनी डाळिंबाचे रोप लावले. दोन वर्षांनंतर त्यांना डाळिंबाचे उत्पादन मिळाले. श्रवण सिंह यांनी डाळिंब बांग्लादेश, नेपाळ आणि दुबईला पाठवले. लॅबमध्ये टेस्ट झाल्यानंतरच फळं बाहेर देशात पाठवली जातात. रिलायन्स फ्रेश, सुपरमार्केट, इरीगेशनसारख्या मल्टिनॅशन कंपन्यांना ते फळं पुरवतात.

अंगुरावर प्रयोग सुरू

श्रवण सिंह हे आता अंगुरावर प्रयोग करत आहेत. डाळिंब, लिंबू, पेरू विकून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये उत्पन्न मिळवतात. आता त्यांनी आपला मोर्चा अंगुर लागवडीकडे वळवला आहे. यात कितपत यश येते, हे येणारी वेळच सांगेल.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान